शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नागपुरात  टिप्परच्या धडकेत कंत्राटदाराचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 22:57 IST

भरधाव टिप्परच्या चालकाने जोरदार धडक मारल्यामुळे एका दुचाकीस्वार कंत्राटदाराचा करुण अंत झाला. शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मिहान परिसरातील सुमठाणा टी पॉईंटवर हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देअमरावती मार्गावर अपघात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भरधाव टिप्परच्या चालकाने जोरदार धडक मारल्यामुळे एका दुचाकीस्वार कंत्राटदाराचा करुण अंत झाला. शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मिहान परिसरातील सुमठाणा टी पॉईंटवर हा भीषण अपघात घडला. राजेशकुमार रामतिरथ बावा (वय २५) असे मृताचे नाव असून तो अमरावती मार्गावरील जबलपूर गॅरेजजवळ, सुराबर्डी तकिया परिसरात राहत होता.राजेशकुमार त्याच्या अ‍ॅक्टीव्हाने (एमएच ४९/ टीसीडी २४८) मिहान परिसरातील काही कंपन्यांमध्ये कंत्राटदारी करीत होता. नेहमीप्रमाणे तो शुक्रवारी दुपारी १२.४५ ला मिहान परिसरात आला. काम आटोपल्यानंतर एका कंपनीत बिल (रक्कम) घ्यायला जात होता. सुमठाणा टी पॉईंटवर वेगात आलेल्या पिवळ्या रंगाच्या टिप्पर (एमएच ४०/ एन ३१९८) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून राजेशकुमारला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो ठार झाला. योगेश रामकृष्णजी दांडगे (वय ३४, रा. बोरी ठाणेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. हवालदार वसंता बशिने यांनी चौकशी करून आरोपी उमेश भीमराव दिनकर (भंडारा) याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू