शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्राहक मंच : पाणी पुरवठा खंडित करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:24 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देतुकडोजी सोसायटीतील रहिवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला.सोसायटीचे पाणी मीटर डिसेंबर-२०१७ ते ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत निकामी होते. सप्टेंबर-२०१९ मध्ये नवीन मीटर बसविण्यात आले. त्यानंतर गेल्या मे महिन्यात सोसायटीला तब्बल ९६ हजार ५४६ रुपयाचे बिल पाठविण्यात आले. त्यात बिलाच्या कालावधीची माहिती स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोसायटीने सरासरी बिलाचा हिशेब लावून ६ हजार रुपये रोख व १४ हजार रुपये आॅनलाईन जमा केले. परिणामी, पाणी पुरवठा विभागाने सोसायटीला २६ जून रोजी पत्र पाठवून चुकीचे बिल भरल्याची माहिती दिली. त्या आधारावर पाणी पुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता लक्षात घेता, सोसायटीने ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली आहे. कोरोना काळात पाणी पुरवठा बंद केला गेल्यास रहिवाशांची गैरसोय होईल, असे सोसायटीचे म्हणणे आहे. मंचने तक्रारीवरील सुनावणीनंतर सोसायटीला पाणी बिलाचे आणखी २० हजार रुपये जमा करण्यास सांगितले व प्रतिवादींना वरील अंतरिम आदेश दिला. सोसायटीतर्फे अ‍ॅड. सौरभ राऊत व अ‍ॅड. व्ही. आर. बसेशंकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे