केवळ गडचिरोलीतच कस्तुरबा कन्या शाळेला इमारती
By Admin | Updated: June 19, 2014 00:55 IST2014-06-19T00:55:43+5:302014-06-19T00:55:43+5:30
शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या परीपूर्ण करून स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणाऱ्या कस्तुरबा गांधी कन्या शाळेला राज्यात अनेक ठिकाणी स्वत:च्या इमारती नाहीत.

केवळ गडचिरोलीतच कस्तुरबा कन्या शाळेला इमारती
दिलीप दहेलकर - गडचिरोली
शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या परीपूर्ण करून स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणाऱ्या कस्तुरबा गांधी कन्या शाळेला राज्यात अनेक ठिकाणी स्वत:च्या इमारती नाहीत. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यात ५ तालुक्यांमध्ये असलेल्या या शाळांना शासनाने स्वत:च्या मालकीच्या इमारती बांधून दिल्या आहे. संपूर्ण शाळांना इमारती उपलब्ध झालेला गडचिरोली हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनूसार नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यात एकूण ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला मान्यता दिली. यापैकी गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा, भामरागड या पाच ठिकाणी विद्यालय सुरू आहे. या शाळांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १० वीचे वर्ग सुरू आहेत. नागपूर विभागात फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये ५ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहेत. या विद्यालयातून अनेक मुली शिक्षण घेत आहेत. या शाळांच्या इमारतीसाठी प्रत्येकी १ कोटी १० लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. या निधीतून शाळा इमारती उभारण्यात आले. राज्यातील ४३ पैकी २९ शाळा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे तर १४ केजीबीवी शाळा शिक्षण परिषदेच्या नियंत्रणाखाली खासगी संस्थामार्फत सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील या शाळा खासगी संस्थाकडे वळते करण्यात येणार होत्या. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतल्याने या शाळा जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सुरू आहेत.