शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान लोकांना जोडते, मनुस्मृती विभाजन करते - चंद्रशेखर आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 20:25 IST

स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी केली.

ठळक मुद्देरविवारी भारत बंदचे आवाहन

नागपूर : आपला देश संविधानावर चालतो. संविधानामुळेच देशाची एकता व अखंडता टिकून आहे. सर्वधर्मसमभाव, रोटी, कपडा व मकान तसेच सर्वांना संरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते. , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी शनिवारी भीम आर्मीतर्फे रेशीमबाग मैदानावर आयोजित संविधानिक संमेलन व कार्यकर्ता मेळाव्यात केली.

सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली मुस्लीम, दलित व आदिवासींना दुय्यम नागरिक त्व देण्याचा छुपा अजेंडा राबवून त्यांचे नागरिक त्व हिरावण्याचे केंद्र सरकारचे षड्यंत्र आहे. या कायद्याला आमचा विरोध आहे. या कायद्याच्या विरोधात २३ फेब्रुवारीला भारत बंद ची घोषणा आझाद यांनी केली. मंचावर समीर अहमद विद्रोही, मलकीतसिंग बल, अशोक कांबळे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, शहर अध्यक्ष मुकेश खडतकर, मनोज मून, वीरा साथीदार, मनीष साठे आदी उपस्थित होते.

नागपूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. मात्र, उच्च न्यायालयाने भीम आर्मीला काही अटी घालत मेळाव्याला परवानगी दिली होती. यावर आझाद म्हणाले, हा देश आमचा आहे. सरकारने अडचणी आणल्या तरी न्यायालयाची शक्ती मोठी आहे. त्याहून मोठी शक्ती या देशातील नागरिक आहेत. तिरंगा हा माझा जीव आहे. याचा अपमान सहन करणार नाही. या मैदानावर प्रथमच झेंडा फडकावत आहे, असे म्हणत आझाद यांनी हातातील तिरंगा झेंडा उंचावला.

हा देश भगवान गौतम बुद्ध, फु ले, शाहू , आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या समता व बंधूभावाच्या विचारावर चालतो. देशावर अनेकदा हल्ले झाले. इंग्रजांनाही वाटले होते की आपण भारतावर राज्य करू. पण जनआंदोलनामुळे त्यांना जावे लागले. आजही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुस्मृतीला मानणाऱ्या संघाच्या विचारावरच केंद्र सरकारचा कारभार सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. जयभीमचा नारा महाराष्ट्राने दिला. आज तो जगभरात घुमत आहे. जेव्हा संसदेत बहुमत राहात नाही अशावेळी रस्त्यावर उतरून संघर्ष करावयाचा असतो. आम्हाला पंतप्रधानांचा सन्मान राखण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यांनीही देशातील नागरिक व संविधानाचा सन्मान करावा. सीएए आणि एनआरसी कायदा लोकांना नको आहे. तो त्यांनी परत घ्यावा, अशी मागणी आझाद यांनी केली.

हक्काच्या गोष्टीसाठी विरोध करतोय पण सभा घेऊ देत नाही. आम्ही देश वाचविण्यासाठी कफन बांधले आहे. प्रसंगी बलिदान देऊ , गुलामीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यात जगणे कधीही चांगले. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचेही ते म्हणाले.समीर अहमद विद्रोही म्हणाले, स्वातंत्र्य व गुलामी एकत्र राहू शकत नाही. राज्यकर्ते मताचा विचार करतात. आम्ही पुढच्या पिढीचा करतो. सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली धर्माच्या आधावर विभाजन के ले जात आहे. आम्ही हा कायदा मानणार नाही.नागेश चौधरी यांनी सीएए आणि एनआरसी हा संघाचा अजेंडा असल्याची टीका केली. मलकीतसिंग बल, अशोक कांबळे यांनीही सीएए व एनआरसीला विरोध केला.संघावर बंदी आणली तरच मनुवाद संपेलसरकारे बदलतात पण विचार बदलत नाही. आम्ही संविधानाला मानतो. संघ मनुवाद मानतो. संघाचे लोक तिरंगा यात्रा काढतात. मग संघ मुख्यालयावर तिरंगा का नाही. असा सवाल करून राष्ट्रीय स्वयसेवक संघावर बंदी घालावी. अशी मागणी आझाद यांनी केली. संघ प्रमुखांनी भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून मनुवादाचा अजेंडा न राबविता थेट निवडणूक लढवावी. संघ प्रमुखांनी खुली चर्चा करावी, असे आव्हान देत नागपूर ही दीक्षाभूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादnagpurनागपूर