शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संविधान लोकांना जोडते, मनुस्मृती विभाजन करते - चंद्रशेखर आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 20:25 IST

स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी केली.

ठळक मुद्देरविवारी भारत बंदचे आवाहन

नागपूर : आपला देश संविधानावर चालतो. संविधानामुळेच देशाची एकता व अखंडता टिकून आहे. सर्वधर्मसमभाव, रोटी, कपडा व मकान तसेच सर्वांना संरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते. , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी शनिवारी भीम आर्मीतर्फे रेशीमबाग मैदानावर आयोजित संविधानिक संमेलन व कार्यकर्ता मेळाव्यात केली.

सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली मुस्लीम, दलित व आदिवासींना दुय्यम नागरिक त्व देण्याचा छुपा अजेंडा राबवून त्यांचे नागरिक त्व हिरावण्याचे केंद्र सरकारचे षड्यंत्र आहे. या कायद्याला आमचा विरोध आहे. या कायद्याच्या विरोधात २३ फेब्रुवारीला भारत बंद ची घोषणा आझाद यांनी केली. मंचावर समीर अहमद विद्रोही, मलकीतसिंग बल, अशोक कांबळे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, शहर अध्यक्ष मुकेश खडतकर, मनोज मून, वीरा साथीदार, मनीष साठे आदी उपस्थित होते.

नागपूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. मात्र, उच्च न्यायालयाने भीम आर्मीला काही अटी घालत मेळाव्याला परवानगी दिली होती. यावर आझाद म्हणाले, हा देश आमचा आहे. सरकारने अडचणी आणल्या तरी न्यायालयाची शक्ती मोठी आहे. त्याहून मोठी शक्ती या देशातील नागरिक आहेत. तिरंगा हा माझा जीव आहे. याचा अपमान सहन करणार नाही. या मैदानावर प्रथमच झेंडा फडकावत आहे, असे म्हणत आझाद यांनी हातातील तिरंगा झेंडा उंचावला.

हा देश भगवान गौतम बुद्ध, फु ले, शाहू , आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या समता व बंधूभावाच्या विचारावर चालतो. देशावर अनेकदा हल्ले झाले. इंग्रजांनाही वाटले होते की आपण भारतावर राज्य करू. पण जनआंदोलनामुळे त्यांना जावे लागले. आजही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुस्मृतीला मानणाऱ्या संघाच्या विचारावरच केंद्र सरकारचा कारभार सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. जयभीमचा नारा महाराष्ट्राने दिला. आज तो जगभरात घुमत आहे. जेव्हा संसदेत बहुमत राहात नाही अशावेळी रस्त्यावर उतरून संघर्ष करावयाचा असतो. आम्हाला पंतप्रधानांचा सन्मान राखण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यांनीही देशातील नागरिक व संविधानाचा सन्मान करावा. सीएए आणि एनआरसी कायदा लोकांना नको आहे. तो त्यांनी परत घ्यावा, अशी मागणी आझाद यांनी केली.

हक्काच्या गोष्टीसाठी विरोध करतोय पण सभा घेऊ देत नाही. आम्ही देश वाचविण्यासाठी कफन बांधले आहे. प्रसंगी बलिदान देऊ , गुलामीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यात जगणे कधीही चांगले. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचेही ते म्हणाले.समीर अहमद विद्रोही म्हणाले, स्वातंत्र्य व गुलामी एकत्र राहू शकत नाही. राज्यकर्ते मताचा विचार करतात. आम्ही पुढच्या पिढीचा करतो. सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली धर्माच्या आधावर विभाजन के ले जात आहे. आम्ही हा कायदा मानणार नाही.नागेश चौधरी यांनी सीएए आणि एनआरसी हा संघाचा अजेंडा असल्याची टीका केली. मलकीतसिंग बल, अशोक कांबळे यांनीही सीएए व एनआरसीला विरोध केला.संघावर बंदी आणली तरच मनुवाद संपेलसरकारे बदलतात पण विचार बदलत नाही. आम्ही संविधानाला मानतो. संघ मनुवाद मानतो. संघाचे लोक तिरंगा यात्रा काढतात. मग संघ मुख्यालयावर तिरंगा का नाही. असा सवाल करून राष्ट्रीय स्वयसेवक संघावर बंदी घालावी. अशी मागणी आझाद यांनी केली. संघ प्रमुखांनी भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून मनुवादाचा अजेंडा न राबविता थेट निवडणूक लढवावी. संघ प्रमुखांनी खुली चर्चा करावी, असे आव्हान देत नागपूर ही दीक्षाभूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादnagpurनागपूर