शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

By आनंद डेकाटे | Updated: January 24, 2025 14:58 IST

किरीट सोमय्या यांचा आरोप : नागपुरातील बांग्लादेशींना शोधून कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ मध्ये दोन लाख बांग्लादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना महाराष्ट्रात भारतीय नागरिक बनवण्याचे मोठे षडयंत्र रचल्या गेले. यासाठी बेकायदेशीर पद्धतीने जन्म दाखले तयार केले गेले. १ लाख ७ हजार लोकांना जन्मदाखले वितिरत झाले. तर ९० हजार लोकांच्या जन्मदाखल्यांची प्रक्रिया सुरू आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ही सर्व जन्म दाखले उशीरा सादर झाली असून यासर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

किरीट सोमय्या यांनी सांगितले की, रोहिंग्या बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळ्याअंतर्गत विविध जिल्ह्यात जन्मदाखल्यासाठी उशीरा अर्ज करणाऱ्यांची माहिती मिळवली आहे. यात धक्कादायक माहिती हाती आली. अनेक जणांनी तर ७० वर्षानंतर अर्ज केला आहे. 

वोट जिहाद अंतर्गत बांग्लादेशी रोहिग्यांना भारतीय नागरिक बनवण्याचे षडयंत्र रचल्या गेले. काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, दहशतवादी संघटना आणि बॉर्डरवरील दोन एजेंट यांनी हे षडयंत्र रचले आहे. हा मोठा गेम प्लान आहे. सरकारने याची दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीने आपले काम सुरू केले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमणावर जन्मदाखले वितिरत करण्यात आले आहेत. मालेगावात दोन अधिकारी निलंबित झाले आहे. इतर जिल्ह्यातील आणखी काही अधिकारी निलंबित होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.  

याअंतर्गत किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. नागपूर जिल्ह्यातही ४ हजारावर जन्मदाखले हे उशीरा सादर झाल्याचे सांगण्यात येते. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सर्वांचा शोध घेऊन बांग्लादेशात परत पाठवाआतापर्यंत ज्या १ लाख ७ हजार बांग्लादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले वितिरत केले, त्यांचा आणि ज्या ९० हजार लोकांच्या प्रमाणपत्रावर कारवाई सुरु आहे, त्यांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना बांग्लादेशात परत पाठवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

मालेगाव बँक घोटाळ्यातला पैसा सोमय्या यांनी सांगितले की, ३७ तालुक्यात जाऊन आलो किंवा माहिती मिळवली, त्यात ९९ टक्के रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. हे कटकारस्थान मालेगाव मध्ये सुरू झाले. आणि यासाठी मालेगाव मध्ये जो बँक घोटाळा झाला त्यातून पैसे पुरवण्यात आले.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याnagpurनागपूर