शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांना बेघर करण्याचा डाव, 'वंचित'चा आरोप

By आनंद डेकाटे | Updated: July 15, 2023 17:40 IST

२० जुलै रोजी वंचितचा मुंबईत महामोर्चा : प्रकाश आंबेडकर करणार नेतृत्व

नागपूर : न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन राज्यातील २ लाख २२ हजार १३५ गरीब अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. येत्या ३० जुलैपर्यंत त्यांना अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लोक दहशतीत आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांचे छत हिसकावून त्यांना बेघर करण्याचा हा डाव असून या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात येत्या २० जुलै रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व वंचितचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

पंजाब राज्यातील गायरान जमिनीवरील आतिक्रमण बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेवर निर्णय देताना संपूर्ण देशात दहा लाख हेक्टरहून अधिक जमीन अतिक्रमणाखाली असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार राज्यातील सर्वच अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आहे. नियमानुसार २० ते ३० वर्षांपासून वास्तव्याला असणाऱ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल केले जाते. अनेक शासन निर्णय व न्यायालयाचे आदेश याबाबत आहे. मात्र न्यायालयाचा आधार घेऊन ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांच्या डोक्यावरील छत काढले जात आहे.

राज्यातील अनेक गावांमध्ये नागरिक दहशतीत आहे. सध्या पहिल्या टप्प्यात नोटीस देण्यात आल्या आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात हा आकडा कितीतरी अधिक वाढेल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, शहराध्यक्ष रवी शेंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीEnchroachmentअतिक्रमणnagpurनागपूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर