शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:41 IST

एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.

ठळक मुद्दे भेटी देऊन आढाव्यासाठी नेमल्या उपसमित्या : दलित नेते, अधिकाऱ्यांना पक्षात आणणार

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.काँग्रेसने पक्षापासून दुरावलेल्या दलित नेते व मतदारांना जवळ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाºयांनाही पक्षात येण्यासाठी विनंती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता राखीव मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी ही उपसमिती पार पाडणार आहे. समिती जबाबदारी दिलेल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेईल. मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, उद्योगपती, व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा करील. मतदारसंघातील धर्मगुरू, अनुसूचित जाती समाजातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन काँग्रेसतर्फे अनुसूचित समाजासाठी केलेल्या व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देईल. समाजाचे मेळावे व शिबिर आयोजित केले जातील. मतदारसंघातील इतर समाजातील नेत्यांची माहिती गोळा केली जाईल. संबंधित मतदारसंघातील प्रभावी वक्त्यांची नावे गोळा करून ती प्रदेश काँग्रेसकडे कळविली जातील. याशिवाय अनुसूचित जाती समाजाचे स्थानिक व राज्य पातळीवरील प्रश्न समजून घेत त्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडे पाठविली जाईल.राजकीय समीकरणांचा देणार अहवालही उपसमिती राखीव मतदारसंघांचा दौरा करेल. तेथील प्रमुख नेत्यांशी चर्चा करेल. दलित समाजातील, संघटनेतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, नेते यांची भेट घेईल. निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात काय करणे आवश्यक आहे, याची माहिती घेईल. सद्यस्थितीत या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी आहेत, ती पक्षाच्या बाजूने वळविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा एकूणच अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.अशी आहे नागपूर विभागीय उपसमितीनागपूर विभागातील उमरेड, उत्तर नागपूर, भंडारा, अर्जुनी मोरगाव, चंद्रपूर हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघांवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आलेल्या विभागीय उपसमितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले किशोर गजभिये, कृष्णकुमार शेंडे, बंडूभाऊ सावरबांधे, शकुर नागाणी, सुरेश भोयर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने ८ मार्चपासून दौरे सुरू केले आहेत. सोमवार, १२ मार्च रोजी ही समिती नागपुरातील देवडिया काँग्रेस भवनात येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र