शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:41 IST

एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.

ठळक मुद्दे भेटी देऊन आढाव्यासाठी नेमल्या उपसमित्या : दलित नेते, अधिकाऱ्यांना पक्षात आणणार

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.काँग्रेसने पक्षापासून दुरावलेल्या दलित नेते व मतदारांना जवळ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाºयांनाही पक्षात येण्यासाठी विनंती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता राखीव मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी ही उपसमिती पार पाडणार आहे. समिती जबाबदारी दिलेल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेईल. मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, उद्योगपती, व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा करील. मतदारसंघातील धर्मगुरू, अनुसूचित जाती समाजातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन काँग्रेसतर्फे अनुसूचित समाजासाठी केलेल्या व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देईल. समाजाचे मेळावे व शिबिर आयोजित केले जातील. मतदारसंघातील इतर समाजातील नेत्यांची माहिती गोळा केली जाईल. संबंधित मतदारसंघातील प्रभावी वक्त्यांची नावे गोळा करून ती प्रदेश काँग्रेसकडे कळविली जातील. याशिवाय अनुसूचित जाती समाजाचे स्थानिक व राज्य पातळीवरील प्रश्न समजून घेत त्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडे पाठविली जाईल.राजकीय समीकरणांचा देणार अहवालही उपसमिती राखीव मतदारसंघांचा दौरा करेल. तेथील प्रमुख नेत्यांशी चर्चा करेल. दलित समाजातील, संघटनेतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, नेते यांची भेट घेईल. निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात काय करणे आवश्यक आहे, याची माहिती घेईल. सद्यस्थितीत या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी आहेत, ती पक्षाच्या बाजूने वळविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा एकूणच अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.अशी आहे नागपूर विभागीय उपसमितीनागपूर विभागातील उमरेड, उत्तर नागपूर, भंडारा, अर्जुनी मोरगाव, चंद्रपूर हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघांवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आलेल्या विभागीय उपसमितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले किशोर गजभिये, कृष्णकुमार शेंडे, बंडूभाऊ सावरबांधे, शकुर नागाणी, सुरेश भोयर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने ८ मार्चपासून दौरे सुरू केले आहेत. सोमवार, १२ मार्च रोजी ही समिती नागपुरातील देवडिया काँग्रेस भवनात येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र