शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:41 IST

एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.

ठळक मुद्दे भेटी देऊन आढाव्यासाठी नेमल्या उपसमित्या : दलित नेते, अधिकाऱ्यांना पक्षात आणणार

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.काँग्रेसने पक्षापासून दुरावलेल्या दलित नेते व मतदारांना जवळ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाºयांनाही पक्षात येण्यासाठी विनंती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता राखीव मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी ही उपसमिती पार पाडणार आहे. समिती जबाबदारी दिलेल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेईल. मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, उद्योगपती, व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा करील. मतदारसंघातील धर्मगुरू, अनुसूचित जाती समाजातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन काँग्रेसतर्फे अनुसूचित समाजासाठी केलेल्या व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देईल. समाजाचे मेळावे व शिबिर आयोजित केले जातील. मतदारसंघातील इतर समाजातील नेत्यांची माहिती गोळा केली जाईल. संबंधित मतदारसंघातील प्रभावी वक्त्यांची नावे गोळा करून ती प्रदेश काँग्रेसकडे कळविली जातील. याशिवाय अनुसूचित जाती समाजाचे स्थानिक व राज्य पातळीवरील प्रश्न समजून घेत त्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडे पाठविली जाईल.राजकीय समीकरणांचा देणार अहवालही उपसमिती राखीव मतदारसंघांचा दौरा करेल. तेथील प्रमुख नेत्यांशी चर्चा करेल. दलित समाजातील, संघटनेतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, नेते यांची भेट घेईल. निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात काय करणे आवश्यक आहे, याची माहिती घेईल. सद्यस्थितीत या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी आहेत, ती पक्षाच्या बाजूने वळविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा एकूणच अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.अशी आहे नागपूर विभागीय उपसमितीनागपूर विभागातील उमरेड, उत्तर नागपूर, भंडारा, अर्जुनी मोरगाव, चंद्रपूर हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघांवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आलेल्या विभागीय उपसमितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले किशोर गजभिये, कृष्णकुमार शेंडे, बंडूभाऊ सावरबांधे, शकुर नागाणी, सुरेश भोयर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने ८ मार्चपासून दौरे सुरू केले आहेत. सोमवार, १२ मार्च रोजी ही समिती नागपुरातील देवडिया काँग्रेस भवनात येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र