शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

“लोकशाही वाचवायला लढत आहोत, तीन राज्ये जिंकली असतील पण...”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 17:18 IST

Congress Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही, अशी टीका करण्यात आली.

Congress Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, सरकारी सेवेत कर्मचारी भरती करावी,  शेतमालाला योग्य भाव मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी,  इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल मोर्चात केली. या हल्लाबोल मोर्चात काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने 'हल्लाबोल' मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नसल्याची टीका केली. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र वेळीच मदत करत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या  मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे  विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावले.

हे सरकार तीन तीघडा काम बिघाडा आहे

तुम्ही तीन राज्य जिंकले असाल पण आज या मोर्चातील उपस्थिती तुम्हाला महाराष्ट्रातून  हाकलून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे सरकार तीन तीघडा काम बिघाडा आहे. पहिले अलिबाबा चाळीस चोर होते आता दोन अलिबाबा ८० चोर आहेत आणि ते  महाराष्ट्र लुटायला निघाले म्हणून हल्लाबोल  आम्ही करत आहोत. राज्यात  बळीराजा  प्रचंड अडचणीत आहे,  शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार  जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही

सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत.  शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही असं म्हणत वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर शेतकरी ,शेतमजूर या सरकारला धडा शिकवेल,नियमित कर्ज भरणाऱयांना आम्ही दिलासा दिला पण हे ट्रिपल इंजिन सरकार  मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, थापाड्या सरकारने  ७५ हजार भरती करण्याची घोषणा केली त्याचे काय झाले असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. शिक्षक भरती नाही, तरुणाच्या हाताला काम नाही, महाराष्ट्रातील कोणताही घटक सुखी नाही. या सरकारमध्ये भांडण सुरू आहे.  राज्यातील मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवावे म्हणून दोन समाजात  भांडण लावण्याचं काम करीत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली . 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस