शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“लोकशाही वाचवायला लढत आहोत, तीन राज्ये जिंकली असतील पण...”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 17:18 IST

Congress Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही, अशी टीका करण्यात आली.

Congress Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, सरकारी सेवेत कर्मचारी भरती करावी,  शेतमालाला योग्य भाव मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी,  इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल मोर्चात केली. या हल्लाबोल मोर्चात काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने 'हल्लाबोल' मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नसल्याची टीका केली. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र वेळीच मदत करत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या  मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे  विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावले.

हे सरकार तीन तीघडा काम बिघाडा आहे

तुम्ही तीन राज्य जिंकले असाल पण आज या मोर्चातील उपस्थिती तुम्हाला महाराष्ट्रातून  हाकलून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे सरकार तीन तीघडा काम बिघाडा आहे. पहिले अलिबाबा चाळीस चोर होते आता दोन अलिबाबा ८० चोर आहेत आणि ते  महाराष्ट्र लुटायला निघाले म्हणून हल्लाबोल  आम्ही करत आहोत. राज्यात  बळीराजा  प्रचंड अडचणीत आहे,  शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार  जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही

सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत.  शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही असं म्हणत वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर शेतकरी ,शेतमजूर या सरकारला धडा शिकवेल,नियमित कर्ज भरणाऱयांना आम्ही दिलासा दिला पण हे ट्रिपल इंजिन सरकार  मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, थापाड्या सरकारने  ७५ हजार भरती करण्याची घोषणा केली त्याचे काय झाले असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. शिक्षक भरती नाही, तरुणाच्या हाताला काम नाही, महाराष्ट्रातील कोणताही घटक सुखी नाही. या सरकारमध्ये भांडण सुरू आहे.  राज्यातील मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवावे म्हणून दोन समाजात  भांडण लावण्याचं काम करीत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली . 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस