शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नागपुरात शहरभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 22:01 IST

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत.सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्याक आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे, सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीच्या वतीने शहर अध्यक्ष श्री. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात म.प्र.कॉ.कमेटीचे सचिव विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, उपाध्यक्ष प्रा.दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, रमन पैगवार, रजत देशमुख, मोतीराम मोहाडीकर, दिनेश तराळे, पंकज थोरात, पंकज निघोट, निर्मला बोरकर, अनिल पांडे, प्रवीण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, राजकुमार कमनानी, देवेद्रसिंग रोटेले, प्रमोदसिंग ठाकूर, सूरज आवळे, इर्शाद मलिक, सुनीता ढोले, अब्दुल शकील, गोपाल पट्टम, इर्शाद अली व इतर शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या ब्लॉकमध्ये आंदोलन केले. रिझर्व बँकेने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा घेतलेला निर्णय हा देशासमोरील आर्थिक संकटाची पुष्टी करणारा असून अशा प्रकारच्या निर्णयामुळे भविष्यात देशासमोर यापेक्षाही मोठे आर्थिक संकट उभे राहणार असल्याची भीती यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केली. नोकऱ्यांमधील रिक्त पदे भरून युवकांना रोजगार द्यावा, अशी मागणी करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये अशोक निखाडे, किशोर गीद, मुजाहीद खान, रमेश निमजे, निशा खान, राहुल खापेकर, महेश श्रीवास, अनिल केसरवानी, सचिन इंगोले, सुरेंद्र रॉय, बालकदास हेडाऊ, मुजाहीद खान, दीनानाथ खरबीकर, ममता तोमर, प्रकाश उमरेडकर, मुजीब खान, राजा चिलाटे, फारुख मलिक, बंडू नगरारे, इजहार अहमद, हसीन अहमद, रिजवान अंसारी, विकास शेडे, मिलिंद कांबळे, शेख हुसेन, अखिल खान, तुफेल अंसारी, विशाल बन्सोड, अदमत अली, शकील अंसारी, शेख समीर, नवाब कुरैशी, खालिद अंसारी, अलिमुद्दीन अंसारी, राकेश वल्का आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन