शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 21:37 IST

विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.

ठळक मुद्देदिवाली मिलनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोमीलन : यापुढे एकजुटीने लढण्याच संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.आ. अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने शनिवारी रामदासपेठ येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे विधानसभेत निवडूण आलेले, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा सत्कार आणि दिवाली मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिल देशमुख, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिलाह अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण होते. पुन्हा पाणिपत होईल, असेच सर्वांना वाटत होते. परंतु ज्या पद्धतीने नागपुरात काँग्रेस आघाडीचे चार आमजदार निवडून आले, त्यामुळे दोन्ही काँग्रेमध्ये नवचैतन्य संचारले आहे. आपल्या भाषणात नेत्यांनी शरद पवार यांना विजयाचे श्रेय देत यापुढे सर्व जण बेकीने नव्हे तर एकीने लढ,असा संकल्प केला. याची सुरुवात सुरुवातीलाच अनिल देशमुख यांच्या पुढकाराने झाली. त्यांनी विलास मुत्तेमवार यांचे स्वागत सतीश चतुर्वेदी यांच्याकडून तर चतुर्वेदी यांचे स्वागत मुत्तेमवार यांच्या हस्ते करून घेतले. उपस्थितांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले.यावेळी विकास ठाकरे, नितीन राऊत, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे, बंटीस शेळके, अनिल देशमुख, राजू पारवे, सुरेश भोयर, विजय घोडमारे यांचा सत्कार करण्यात आला. दोन उमेदवार वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस