शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लहान राज्यांच्या निर्मितीची सुरुवात विदर्भापासून करावी; आशिष देशमुखांचं पंतप्रधान मोदींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 13:02 IST

यासंबंधीची घोषणा येत्या १५ ऑगस्टला देशाला उद्देशून संभाषणात करावी, अशी विनंती माजी आ. आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशात एकूण ७५ राज्यांची निर्मिती करावी. याची सुरुवात ‘विदर्भ’ या ३० व्या राज्याची निर्मिती करून करावी आणि यासंबंधीची घोषणा येत्या १५ ऑगस्टला देशाला उद्देशून संभाषणात करावी, अशी विनंती माजी आ. आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.

देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या शेजारी निर्माण झालेल्या लहान राज्यांची प्रगती वेगाने सुरू आहे. दरडोई उत्पन्न दुप्पट झाले आहे. विदर्भासारखा सुजलाम् सुफलाम् प्रदेश मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. विदर्भ राज्य निर्माण केल्याशिवाय विदर्भात आर्थिक समृद्धी येणे अशक्य आहे. मागील ७० वर्षांपासून महाराष्ट्रात राहून विदर्भावर अन्यायच होत आहे. याचा दुष्परिणाम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील सर्वच क्षेत्रातील विकासकामांवर झाला असून, अनुशेष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह!

महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. हे राज्य स्वत:च्या गरजा पूर्ण करू शकत नसेल, तर एका वेगळ्या राज्याएवढी लोकसंख्या आणि त्याहून मोठे प्रश्न असलेल्या विदर्भाच्या गरजा कशा पूर्ण करू शकेल, हा मोठा प्रश्न आहे. न्या. फझल अली आयोगाने (राज्य पुनर्गठन आयोग) स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यासाठी शिफारस केली होती. त्याची दखल अजूनही घेतली गेलेली नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही अनेक दशके जुनी आहे. ज्यांची मागणी नव्हती, अशी राज्ये निर्माण झाली. आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करून आपण न्याय द्यावा, अशी मागणीही देशमुख यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Deshmukhआशीष देशमुखNarendra Modiनरेंद्र मोदीVidarbhaविदर्भcongressकाँग्रेस