शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी १९० जागा जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:30 PM

सत्ताधारी भाजपला हिंदी भाषिक भागांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांदरम्यान काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहासचिव अविनाश पांडे यांचा दावा : राजस्थानच्या सर्व जागांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्ताधारी भाजपला हिंदी भाषिक भागांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस १२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांदरम्यान काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी केला आहे.अविनाश पांडे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा करताना लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता २०१४ च्या निवडणुकीपेक्षा खूप घसरली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या ‘एअर स्ट्राईक’ कारवाईचे ज्या प्रकारे राजकारण करण्यात आले, ते नागरिकांना आवडलेले नाही. भाजपा मुख्य मुद्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे, यात ते यशस्वी होणार नाही. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकालाने हिंदी भाषिक राज्यातील नागरिक काय विचार करीत आहेत, ते दिसून आले आहे. ते ज्या राजस्थानचे प्रभारी आहेत, तेथील सर्व २५ जागांवर काँग्रेसची नजर आहे. येथे काँग्रेस २० पेक्षा अधिक जागा जिंकेल. इतर पक्षांच्या मदतीने काँग्रेस केंद्रात सरकार स्थापन करण्यास यशस्वी ठरेल, असा दावाही त्यांनी केला.उत्तर प्रदेशातील निकाल आश्चर्यचकित करणारपांडे म्हणाले, उत्तर प्रदेशातील निकाल आश्चर्यचकित करणारे असतील. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या खूप मेहनत घेत आहेत. त्यांची मेहनत निश्चितच फळास येईल. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढेल. भाजपला तिथे मोठे नुकसान होईल. व्यापारी, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आदी समाज भाजपावर नाराज आहे. निवडणुकीत याचा परिणाम निश्चित दिसून येईल.महाराष्ट्रातही युतीला मातनागपूर लोकसभा मतदारसंघातील लढत काट्याची होईल. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी भाजप-शिवसेनेला मात देईल, असा दावाही त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAvinash Pandeyअविनाश पांडे