शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
2
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
7
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
8
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
9
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
10
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
11
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
12
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
13
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
14
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
15
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
16
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
17
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
18
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
19
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
20
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसचा उन्माद विधानसभा निवडणुकीत उतरविणार, नागपूर ग्रामीणमध्ये सहाही जागा जिंकणार", खा. अनिल बोंडे यांचा दावा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 23, 2024 19:55 IST

Anil Bonde News: लोकसभेच्या काही जागा थोड्याशा फरकाने जिंकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उन्माद आला आहे. त्याचा प्रत्यय देशातील जनतेला नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून, खा. बळवंत वानखेडे यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडून आणि खा. प्रतिभा धानोरकर यांनी शिव्यांची लाखोटी वाहून आला आहे.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - लोकसभेच्या काही जागा थोड्याशा फरकाने जिंकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उन्माद आला आहे. त्याचा प्रत्यय देशातील जनतेला नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून, खा. बळवंत वानखेडे यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडून आणि खा. प्रतिभा धानोरकर यांनी शिव्यांची लाखोटी वाहून आला आहे. काँग्रेसचा हा उन्माद विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय मिळवून नक्कीच उतरवू, असा विश्वास खा. अनिल बोंडे यांनी येथे व्यक्त केला. 

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर कार्यालयात रविवारी नागपूर ग्रामीणमधील १५० कार्यकर्त्यांना बैठकीत खा. अनिल बोंडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले. यावेळी भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते. खा. अनिल बोंडे म्हणाले, राखीव मतदारसंघातून निवडून आलेले बळवंत वानखेडे यांना यशोमती ठाकूर यांनी सरकारी मालमत्तेचे कुलूप तोडताना हाताने फिरविले आणि त्यांना  अपमानास्पद वागणूक दिली. ही खोली रा.सु. गवई यांच्या निधीतून उभारण्यात आली आहे. खा. आनंदराव अडसूळ यांचे कार्यालय होते. सन २०२२ रोजी मी राज्यसभेवर गेल्यानंतर या खोलीत माझे आणि खा. नवनीत राणा यांचे कार्यकर्ते बसायचे. त्यानंतर त्या खोलीला कुलूप लावण्यात आले. पण बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट न पाहता थेट सरकारी मालमत्तेचे कुलूपच तोडले. काँग्रेसचा हा उन्माद आता सहन करणार नाही, असा इशारा खा. बोंडे यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५० नवीन मतदार वाढविणार आहे. २३ जून ते ६ जुलैपर्यंत श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान पंधरवडा आणि यादरम्यान अनेक उपक्रम व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. कापूस व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ हजार कोटींची मदत दिली. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करणार असल्याचे खा. बोंडे म्हणाले. 

विधानसभेच्या सहाही जागा जिंकू - सुधाकर कोहळेसुधाकर कोहळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जागतिक संघटनांनी एकत्रित येऊन सोशल मीडियातून संविधान धोक्यात असल्याचे सांगून जनतेत संभ्रम पसरविला. रामटेक लोकसभा मतदारसंघात बहुतांश क्षेत्रात भाजपा पुढे आहे. आता नागपूर ग्रामीण मतदार संघाच्या सहाही जागा मोठ्या फरकाने जिंकू.  कोहळे म्हणाले, वेळेवर उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही. परंतु पंतप्रधान मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या. संभ्रम दूर केला. शिवसेनेच्या उमेदवाराला ५.३३ लाख मते मिळाली. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे म्हणून १५०० मतदार असलेल्या बूथचे विभाजन, प्रत्येक बूथवर ५० नवीन मतदार करू आणि चूका सुधारू. आता विधानसभानिहाय जाऊन जनजागृती करणार आहे. भाजपा जिंकल्यानंतर उन्माद करीत नाही आणि हरल्यानंतर निराश होत नाही, असे कोहळे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत माजी आ. मल्ल्किार्जुन रेड्डी, अशोक धोटे, राजू पोतदार, अरविंद गजभिये, सुधीर पारवे, आनंदराव राऊत, उदयसिंग यादव, संध्या गोतमारे आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेBJPभाजपाcongressकाँग्रेस