शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा सफाया

By admin | Updated: October 20, 2014 00:41 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने

पाचही जागा भाजपाकडे : मुलाचे डिपॉझिट वाचविण्यातही अपयश यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा पुरता सफाया झाला आहे. येथे काँग्रेसच्या ताब्यातील पाचही जागा भाजपाने पटकाविल्या आहेत. एवढेच नव्हे तर माणिकरावांना आपल्या मुलाचे डिपॉझिटही वाचविता आलेले नाही. यवतमाळ जिल्ह्यात पूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार काँग्रेसचे होते. या निवडणुकीत मात्र या पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वाधिक दैनावस्था काँग्रेसची झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने अनुक्रमे मनोहरराव नाईक (पुसद) आणि संजय राठोड (दिग्रस) यांच्या रुपाने आपल्या जागा कायम राखल्या. संजय राठोड यांची मतांची आघाडी राज्यात सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. हे दोनही उमेदवार मताधिक्याने निवडून आले. संजय राठोड यांनी आपली विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तर यवतमाळचे भाजपाचे उमेदवार मदन येरावार यांना निसटता विजय प्राप्त करता आला. त्यांना शिवसेनेचे सामान्य उमेदवार संतोष ढवळे यांनी जबर टक्कर दिली. वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संजीव रेड्डी बोदकुरवार अनपेक्षितरीत्या निवडून आले. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार या दिग्गजांसह उमरखेडचे आमदार विजय खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुरके तब्बल ४० हजार मतांनी पराभूत झाले. जिल्ह्यातील भाजपाचे चार उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. पक्षाच्या दृष्टीने ते नवे चेहरे ठरले आहे. जिल्ह्यात नरेंद्र मोदींची सभा झालेली नसताना भाजपाने तब्बल पाच जागा मिळविणे हे मोठे यश मानले जात आहे. भाजपा व राष्ट्रवादीतून ऐनवेळी शिवसेनेत उडी मारणाऱ्या दोन उमेदवारांना मतदारांनी नाकारले. (जिल्हा प्रतिनिधी)पुत्र राहुल ठाकरे चौथ्या क्रमांकावरमाणिकराव ठाकरे यांना किमान आपल्या गृहजिल्ह्यातही काँग्रेस वाचविता आली नाही. माणिकरावांनी यवतमाळच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापून ते मुलगा राहुल ठाकरे यांना बहाल केले. सर्वांचा विरोध पत्करुन आणि ऐनवेळी पद सोडण्याची धमकी देऊन माणिकरावांनी मुलासाठी तिकीट आणले असली तरी त्यांना त्याला विजयी करता आलेले नाही. निवडणूक काळात माणिकरावांनी आपली संपूर्ण शक्ती यवतमाळात खर्च केली. त्यासाठी राज्यातील अन्य उमेदवारांना वाऱ्यावर सोडले गेले. मात्र त्यानंतरही यश आले नाही. राहुल ठाकरे तब्बल चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.