शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलवर काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:14 IST

शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देविविध मागण्यांकडे वेधले लक्ष : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याकडे शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सोपविले.बसस्थानकाजवळून हा विराट मोर्चा निघाला. त्यात रामटेकसह पारशिवनी व मौदा तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, महिलांची लक्षणीय संख्या होती. रामटेक-पारशिवनी तालुक्यातील मालगुजारी तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्याचे खोलीकरण व दुरुस्ती करून शेतकऱ्यांची सिंचनाची सोय करावी, पेंच प्रकल्पाच्या पाण्याची रबी पिकासाठी व्यवस्था करण्यात यावी, शिवनी भोंडकी येथील तलावातून लिफ्ट इरिगेशनची सोय व्हावी यासाठी पाईपची दुरुस्ती करावी, रामटेक-पारशिवनी परिसरात नदीनाल्यावरील रेतीघाटांचे लिलाव करावे, आदिवासी भागातील महिला मजुरांना ने-आण करण्यासाठी जीप-कमांडरसारख्या वाहनांचा उपयोग केला जातो; अशा वाहनांवर कारवाई करू नये, तालुक्यात आधार कार्ड सेंटरची संख्या वाढवावी, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्या, देवलापारला तहसील कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा, सिंगोरी कोल प्रोजेक्टबाधितांना रोजगार द्यावा, सिंगोरी पाण्याची व्यवस्था करावी, प्रोजेक्टमुळे बंद झालेल्या रस्त्यांऐवजी डोरली-साहोली व डोरली-सोनेगाव-पारशिवनी असे रस्ते तयार करावे, नगरधन गावाकरिता बायपास रस्ता तयार करावा, नगरधनच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करावे, नगरधनमध्ये कालिदास महोत्सव दरवर्षी घेण्यात यावा, सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा, हमलापुरी फाटा येथील वनविभागाच्या जागेत क्रीडांगण तयार करावे, किल्ला परिसरात कालिदासांचा पुतळा उभारावा, बोरी ते शिरपूर पांदण रस्त्याचे तसेच बोरी ते खात रस्त्याचे डांबरीकरण करावे, बोरी येथे प्रवासी निवाराकरिता बांधकाम करावे, सिंचन विहिरीकरिता ५०० फूट अंतराची अट रद्द करावी, पेंचचे पाणी वेळेवर न मिळाल्याने नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, केशवराजा देवस्थानला तीर्थस्थळाचा ‘क’ दर्जा देण्यात यावा, गरिबांना रेशन कार्डवर धान्य द्यावे, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता.रामटेकमधील समस्या सोडवारामटेक नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीतील विविध मागण्यांकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. पाणीसमस्या दूर करून नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, आदिवासी घरकुल योजना राबवावी, रखडलेला स्विमिंग पूल सुरू करावा, राखी तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मालमत्ता कर कमी करावा, कालिदास स्मारक परिसरात विद्युत व्यवस्था करावी, राजकमल रिसॉर्ट परिसरात स्वच्छता करावी, गडमंदिरावर यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रामटेक शहराकरिता मत्स्य केंद्र सुरू करावे, मृगविहारजवळील यात्री माहिती केंद्र सुरू करावे, महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कमी व्याजदराज कर्ज उपलब्ध करावे, रामटेक बायपाससह बसस्थानक, मुरमुरा भट्टी ते किटस् या मार्गावर पथदिवे लावावे, मालकी हक्काचे पट्टे त्वरित वाटप करावे, ७२ घरकुल योजनेंतर्गत घरकुलाचे वाटप करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.रामटेकसह मौदा पारशिवनीतील हजारो लोकांचा सहभागया हल्लाबोल मोर्चात डॉ. अमोल देशमुख यांच्यासह डॉ. सुचिका देशमुख, शिशुपाल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य कोमलचंद्र राऊत, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, मोहन यादव, कैलास राऊत, देवाजी कुंभरे, माजी सभापती अनिता भड, रामटेकच्या माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, महेंद्र टक्कामोरे, गजानन भेदे, मधुकर बेले, रंजना कोल्हे, शुभांगी रामेलवार, नदिम जामा, रोशन मेश्राम, नौशाद शेख, दुर्गा लोंढे, इजराईल शेख, चाँदभाई, गंगाधर काकडे, रमेश गोमकाळे, मोरेश्वर फुलबांधे, नलिनी फुलबांधे, नरेश ढोणे, शैलेश शिंदेकर, सलीम बाघाडे, कुणाल मेश्राम, रमेश कडू, विजय ठाकरे, भावना मडावी, पुष्पा बर्वे, कमरुन्निसा शेख, कौशल्या बघेले, वनिता मेश्राम, डोमाजी चकोले, प्रमोद बरबटे, शेषराव देशमुख, पुरुषोत्तम धोटे, सदाशिव बर्वे, रवी चवरे, पिंटू वरखडे, संगीता वांढरे, डुमण चकोले, धनराज पालीवाल, भारत देशमुख, भगवान राऊत, नाना बावणे, सुभाष ढगे, अनिल भोरसले, अनिल निंबाळकर, संजय उईके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर