शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलवर काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:14 IST

शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देविविध मागण्यांकडे वेधले लक्ष : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याकडे शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सोपविले.बसस्थानकाजवळून हा विराट मोर्चा निघाला. त्यात रामटेकसह पारशिवनी व मौदा तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, महिलांची लक्षणीय संख्या होती. रामटेक-पारशिवनी तालुक्यातील मालगुजारी तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्याचे खोलीकरण व दुरुस्ती करून शेतकऱ्यांची सिंचनाची सोय करावी, पेंच प्रकल्पाच्या पाण्याची रबी पिकासाठी व्यवस्था करण्यात यावी, शिवनी भोंडकी येथील तलावातून लिफ्ट इरिगेशनची सोय व्हावी यासाठी पाईपची दुरुस्ती करावी, रामटेक-पारशिवनी परिसरात नदीनाल्यावरील रेतीघाटांचे लिलाव करावे, आदिवासी भागातील महिला मजुरांना ने-आण करण्यासाठी जीप-कमांडरसारख्या वाहनांचा उपयोग केला जातो; अशा वाहनांवर कारवाई करू नये, तालुक्यात आधार कार्ड सेंटरची संख्या वाढवावी, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्या, देवलापारला तहसील कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा, सिंगोरी कोल प्रोजेक्टबाधितांना रोजगार द्यावा, सिंगोरी पाण्याची व्यवस्था करावी, प्रोजेक्टमुळे बंद झालेल्या रस्त्यांऐवजी डोरली-साहोली व डोरली-सोनेगाव-पारशिवनी असे रस्ते तयार करावे, नगरधन गावाकरिता बायपास रस्ता तयार करावा, नगरधनच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करावे, नगरधनमध्ये कालिदास महोत्सव दरवर्षी घेण्यात यावा, सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा, हमलापुरी फाटा येथील वनविभागाच्या जागेत क्रीडांगण तयार करावे, किल्ला परिसरात कालिदासांचा पुतळा उभारावा, बोरी ते शिरपूर पांदण रस्त्याचे तसेच बोरी ते खात रस्त्याचे डांबरीकरण करावे, बोरी येथे प्रवासी निवाराकरिता बांधकाम करावे, सिंचन विहिरीकरिता ५०० फूट अंतराची अट रद्द करावी, पेंचचे पाणी वेळेवर न मिळाल्याने नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, केशवराजा देवस्थानला तीर्थस्थळाचा ‘क’ दर्जा देण्यात यावा, गरिबांना रेशन कार्डवर धान्य द्यावे, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता.रामटेकमधील समस्या सोडवारामटेक नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीतील विविध मागण्यांकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. पाणीसमस्या दूर करून नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, आदिवासी घरकुल योजना राबवावी, रखडलेला स्विमिंग पूल सुरू करावा, राखी तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मालमत्ता कर कमी करावा, कालिदास स्मारक परिसरात विद्युत व्यवस्था करावी, राजकमल रिसॉर्ट परिसरात स्वच्छता करावी, गडमंदिरावर यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रामटेक शहराकरिता मत्स्य केंद्र सुरू करावे, मृगविहारजवळील यात्री माहिती केंद्र सुरू करावे, महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कमी व्याजदराज कर्ज उपलब्ध करावे, रामटेक बायपाससह बसस्थानक, मुरमुरा भट्टी ते किटस् या मार्गावर पथदिवे लावावे, मालकी हक्काचे पट्टे त्वरित वाटप करावे, ७२ घरकुल योजनेंतर्गत घरकुलाचे वाटप करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.रामटेकसह मौदा पारशिवनीतील हजारो लोकांचा सहभागया हल्लाबोल मोर्चात डॉ. अमोल देशमुख यांच्यासह डॉ. सुचिका देशमुख, शिशुपाल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य कोमलचंद्र राऊत, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, मोहन यादव, कैलास राऊत, देवाजी कुंभरे, माजी सभापती अनिता भड, रामटेकच्या माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, महेंद्र टक्कामोरे, गजानन भेदे, मधुकर बेले, रंजना कोल्हे, शुभांगी रामेलवार, नदिम जामा, रोशन मेश्राम, नौशाद शेख, दुर्गा लोंढे, इजराईल शेख, चाँदभाई, गंगाधर काकडे, रमेश गोमकाळे, मोरेश्वर फुलबांधे, नलिनी फुलबांधे, नरेश ढोणे, शैलेश शिंदेकर, सलीम बाघाडे, कुणाल मेश्राम, रमेश कडू, विजय ठाकरे, भावना मडावी, पुष्पा बर्वे, कमरुन्निसा शेख, कौशल्या बघेले, वनिता मेश्राम, डोमाजी चकोले, प्रमोद बरबटे, शेषराव देशमुख, पुरुषोत्तम धोटे, सदाशिव बर्वे, रवी चवरे, पिंटू वरखडे, संगीता वांढरे, डुमण चकोले, धनराज पालीवाल, भारत देशमुख, भगवान राऊत, नाना बावणे, सुभाष ढगे, अनिल भोरसले, अनिल निंबाळकर, संजय उईके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर