शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलवर काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:14 IST

शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देविविध मागण्यांकडे वेधले लक्ष : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याकडे शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सोपविले.बसस्थानकाजवळून हा विराट मोर्चा निघाला. त्यात रामटेकसह पारशिवनी व मौदा तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, महिलांची लक्षणीय संख्या होती. रामटेक-पारशिवनी तालुक्यातील मालगुजारी तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्याचे खोलीकरण व दुरुस्ती करून शेतकऱ्यांची सिंचनाची सोय करावी, पेंच प्रकल्पाच्या पाण्याची रबी पिकासाठी व्यवस्था करण्यात यावी, शिवनी भोंडकी येथील तलावातून लिफ्ट इरिगेशनची सोय व्हावी यासाठी पाईपची दुरुस्ती करावी, रामटेक-पारशिवनी परिसरात नदीनाल्यावरील रेतीघाटांचे लिलाव करावे, आदिवासी भागातील महिला मजुरांना ने-आण करण्यासाठी जीप-कमांडरसारख्या वाहनांचा उपयोग केला जातो; अशा वाहनांवर कारवाई करू नये, तालुक्यात आधार कार्ड सेंटरची संख्या वाढवावी, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्या, देवलापारला तहसील कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा, सिंगोरी कोल प्रोजेक्टबाधितांना रोजगार द्यावा, सिंगोरी पाण्याची व्यवस्था करावी, प्रोजेक्टमुळे बंद झालेल्या रस्त्यांऐवजी डोरली-साहोली व डोरली-सोनेगाव-पारशिवनी असे रस्ते तयार करावे, नगरधन गावाकरिता बायपास रस्ता तयार करावा, नगरधनच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करावे, नगरधनमध्ये कालिदास महोत्सव दरवर्षी घेण्यात यावा, सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा, हमलापुरी फाटा येथील वनविभागाच्या जागेत क्रीडांगण तयार करावे, किल्ला परिसरात कालिदासांचा पुतळा उभारावा, बोरी ते शिरपूर पांदण रस्त्याचे तसेच बोरी ते खात रस्त्याचे डांबरीकरण करावे, बोरी येथे प्रवासी निवाराकरिता बांधकाम करावे, सिंचन विहिरीकरिता ५०० फूट अंतराची अट रद्द करावी, पेंचचे पाणी वेळेवर न मिळाल्याने नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, केशवराजा देवस्थानला तीर्थस्थळाचा ‘क’ दर्जा देण्यात यावा, गरिबांना रेशन कार्डवर धान्य द्यावे, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता.रामटेकमधील समस्या सोडवारामटेक नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीतील विविध मागण्यांकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. पाणीसमस्या दूर करून नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, आदिवासी घरकुल योजना राबवावी, रखडलेला स्विमिंग पूल सुरू करावा, राखी तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मालमत्ता कर कमी करावा, कालिदास स्मारक परिसरात विद्युत व्यवस्था करावी, राजकमल रिसॉर्ट परिसरात स्वच्छता करावी, गडमंदिरावर यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रामटेक शहराकरिता मत्स्य केंद्र सुरू करावे, मृगविहारजवळील यात्री माहिती केंद्र सुरू करावे, महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कमी व्याजदराज कर्ज उपलब्ध करावे, रामटेक बायपाससह बसस्थानक, मुरमुरा भट्टी ते किटस् या मार्गावर पथदिवे लावावे, मालकी हक्काचे पट्टे त्वरित वाटप करावे, ७२ घरकुल योजनेंतर्गत घरकुलाचे वाटप करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.रामटेकसह मौदा पारशिवनीतील हजारो लोकांचा सहभागया हल्लाबोल मोर्चात डॉ. अमोल देशमुख यांच्यासह डॉ. सुचिका देशमुख, शिशुपाल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य कोमलचंद्र राऊत, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, मोहन यादव, कैलास राऊत, देवाजी कुंभरे, माजी सभापती अनिता भड, रामटेकच्या माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, महेंद्र टक्कामोरे, गजानन भेदे, मधुकर बेले, रंजना कोल्हे, शुभांगी रामेलवार, नदिम जामा, रोशन मेश्राम, नौशाद शेख, दुर्गा लोंढे, इजराईल शेख, चाँदभाई, गंगाधर काकडे, रमेश गोमकाळे, मोरेश्वर फुलबांधे, नलिनी फुलबांधे, नरेश ढोणे, शैलेश शिंदेकर, सलीम बाघाडे, कुणाल मेश्राम, रमेश कडू, विजय ठाकरे, भावना मडावी, पुष्पा बर्वे, कमरुन्निसा शेख, कौशल्या बघेले, वनिता मेश्राम, डोमाजी चकोले, प्रमोद बरबटे, शेषराव देशमुख, पुरुषोत्तम धोटे, सदाशिव बर्वे, रवी चवरे, पिंटू वरखडे, संगीता वांढरे, डुमण चकोले, धनराज पालीवाल, भारत देशमुख, भगवान राऊत, नाना बावणे, सुभाष ढगे, अनिल भोरसले, अनिल निंबाळकर, संजय उईके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर