शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलवर काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:14 IST

शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देविविध मागण्यांकडे वेधले लक्ष : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येऊन उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याकडे शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सोपविले.बसस्थानकाजवळून हा विराट मोर्चा निघाला. त्यात रामटेकसह पारशिवनी व मौदा तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, महिलांची लक्षणीय संख्या होती. रामटेक-पारशिवनी तालुक्यातील मालगुजारी तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्याचे खोलीकरण व दुरुस्ती करून शेतकऱ्यांची सिंचनाची सोय करावी, पेंच प्रकल्पाच्या पाण्याची रबी पिकासाठी व्यवस्था करण्यात यावी, शिवनी भोंडकी येथील तलावातून लिफ्ट इरिगेशनची सोय व्हावी यासाठी पाईपची दुरुस्ती करावी, रामटेक-पारशिवनी परिसरात नदीनाल्यावरील रेतीघाटांचे लिलाव करावे, आदिवासी भागातील महिला मजुरांना ने-आण करण्यासाठी जीप-कमांडरसारख्या वाहनांचा उपयोग केला जातो; अशा वाहनांवर कारवाई करू नये, तालुक्यात आधार कार्ड सेंटरची संख्या वाढवावी, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्या, देवलापारला तहसील कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा, सिंगोरी कोल प्रोजेक्टबाधितांना रोजगार द्यावा, सिंगोरी पाण्याची व्यवस्था करावी, प्रोजेक्टमुळे बंद झालेल्या रस्त्यांऐवजी डोरली-साहोली व डोरली-सोनेगाव-पारशिवनी असे रस्ते तयार करावे, नगरधन गावाकरिता बायपास रस्ता तयार करावा, नगरधनच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करावे, नगरधनमध्ये कालिदास महोत्सव दरवर्षी घेण्यात यावा, सूर्यलक्ष्मी कॉटन मिलमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा, हमलापुरी फाटा येथील वनविभागाच्या जागेत क्रीडांगण तयार करावे, किल्ला परिसरात कालिदासांचा पुतळा उभारावा, बोरी ते शिरपूर पांदण रस्त्याचे तसेच बोरी ते खात रस्त्याचे डांबरीकरण करावे, बोरी येथे प्रवासी निवाराकरिता बांधकाम करावे, सिंचन विहिरीकरिता ५०० फूट अंतराची अट रद्द करावी, पेंचचे पाणी वेळेवर न मिळाल्याने नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, केशवराजा देवस्थानला तीर्थस्थळाचा ‘क’ दर्जा देण्यात यावा, गरिबांना रेशन कार्डवर धान्य द्यावे, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता.रामटेकमधील समस्या सोडवारामटेक नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीतील विविध मागण्यांकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. पाणीसमस्या दूर करून नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, आदिवासी घरकुल योजना राबवावी, रखडलेला स्विमिंग पूल सुरू करावा, राखी तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मालमत्ता कर कमी करावा, कालिदास स्मारक परिसरात विद्युत व्यवस्था करावी, राजकमल रिसॉर्ट परिसरात स्वच्छता करावी, गडमंदिरावर यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रामटेक शहराकरिता मत्स्य केंद्र सुरू करावे, मृगविहारजवळील यात्री माहिती केंद्र सुरू करावे, महिलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कमी व्याजदराज कर्ज उपलब्ध करावे, रामटेक बायपाससह बसस्थानक, मुरमुरा भट्टी ते किटस् या मार्गावर पथदिवे लावावे, मालकी हक्काचे पट्टे त्वरित वाटप करावे, ७२ घरकुल योजनेंतर्गत घरकुलाचे वाटप करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.रामटेकसह मौदा पारशिवनीतील हजारो लोकांचा सहभागया हल्लाबोल मोर्चात डॉ. अमोल देशमुख यांच्यासह डॉ. सुचिका देशमुख, शिशुपाल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य कोमलचंद्र राऊत, माजी सभापती हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, मोहन यादव, कैलास राऊत, देवाजी कुंभरे, माजी सभापती अनिता भड, रामटेकच्या माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, महेंद्र टक्कामोरे, गजानन भेदे, मधुकर बेले, रंजना कोल्हे, शुभांगी रामेलवार, नदिम जामा, रोशन मेश्राम, नौशाद शेख, दुर्गा लोंढे, इजराईल शेख, चाँदभाई, गंगाधर काकडे, रमेश गोमकाळे, मोरेश्वर फुलबांधे, नलिनी फुलबांधे, नरेश ढोणे, शैलेश शिंदेकर, सलीम बाघाडे, कुणाल मेश्राम, रमेश कडू, विजय ठाकरे, भावना मडावी, पुष्पा बर्वे, कमरुन्निसा शेख, कौशल्या बघेले, वनिता मेश्राम, डोमाजी चकोले, प्रमोद बरबटे, शेषराव देशमुख, पुरुषोत्तम धोटे, सदाशिव बर्वे, रवी चवरे, पिंटू वरखडे, संगीता वांढरे, डुमण चकोले, धनराज पालीवाल, भारत देशमुख, भगवान राऊत, नाना बावणे, सुभाष ढगे, अनिल भोरसले, अनिल निंबाळकर, संजय उईके आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर