शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या जंगलातील संघर्ष न्यायालयात! आदिवासी हक्कांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:33 IST

Nagpur : गडचिरोलीचे आमदार नरोटे यांचा हायकोर्टात अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मध्यस्थी अर्ज दाखल करून राज्य वन्यजीव मंडळाने विदर्भातील व्याघ्र कॉरिडॉरसंदर्भात घेतलेला निर्णय आदिवासी नागरिकांच्या हिताचा आहे, असा दावा केला आहे.

संबंधित निर्णयाविरुद्ध पर्यावरणप्रेमी नागरिक शीतल कोल्हे व उदयन पाटील यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉ. नरोटे यांनी या याचिकेमध्ये मध्यस्थी करण्यासाठी अॅड. मोहित खजांची यांच्यामार्फत हा अर्ज दाखल केला आहे. गडचिरोली हा मागासलेला जिल्हा असून, जिल्ह्याच्या ७० टक्के क्षेत्रामध्ये जंगल आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी नागरिकांची उपजीविका या जंगलातील उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे आदिवासी नागरिकांचे अधिकार व समस्या न्यायालयासमक्ष मांडणे आवश्यक आहे, असे नरोटे यांनी नमूद करून याचिकेत मध्यस्थी करण्याची परवानगी मागितली आहे.

विदर्भाकरिता व्याघ्र कॉरिडॉर विदर्भाकरिता व्याघ्र कॉरिडॉर निर्धारित करताना राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचा २०१४ मधील व्याघ्र कॉरिडॉर अहवाल आणि निर्णय समर्थन प्रणाली या दोनच गोष्टी विचारात घेतल्या जातील, असा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाने १७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे. नरोटे यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. मंडळाने व्यापक जनहित पाहून हा निर्णय घेतला आहे. निर्णय कायदेशीर आहे. निर्णय घेताना वन्यजीव संरक्षण कायद्याचे काटेकोर पालन करण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे. हा निर्णय वन्यजीवांच्या हिताचा नाही, असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणावर येत्या ४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

अयोग्य कॉरिडॉरमुळे विकास रखडला

  • यापूर्वी व्याघ्र कॉरिडॉर अयोग्य पद्धतीने निर्धारित करण्यात आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास रखडला. विकास प्रकल्पांकरिता वन्यजीव मंडळाची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे.
  • परिणामी, पक्के रोड, वीज २ वाहिन्या, सिंचन इत्यादी पायाभूत प्रकल्प रखडले आहेत. पक्के रोड नसल्याने पावसाळ्यामध्ये अनेक गावांचा मुख्य क्षेत्रापासून संपर्क तुटतो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र कॉरिडॉर निश्चित करताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे, याकडेही डॉ. नरोटे यांनी लक्ष वेधले आहे.
टॅग्स :nagpurनागपूर