शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
2
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
3
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
5
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
6
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
7
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

गडचिरोलीच्या जंगलातील संघर्ष न्यायालयात! आदिवासी हक्कांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:33 IST

Nagpur : गडचिरोलीचे आमदार नरोटे यांचा हायकोर्टात अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मध्यस्थी अर्ज दाखल करून राज्य वन्यजीव मंडळाने विदर्भातील व्याघ्र कॉरिडॉरसंदर्भात घेतलेला निर्णय आदिवासी नागरिकांच्या हिताचा आहे, असा दावा केला आहे.

संबंधित निर्णयाविरुद्ध पर्यावरणप्रेमी नागरिक शीतल कोल्हे व उदयन पाटील यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉ. नरोटे यांनी या याचिकेमध्ये मध्यस्थी करण्यासाठी अॅड. मोहित खजांची यांच्यामार्फत हा अर्ज दाखल केला आहे. गडचिरोली हा मागासलेला जिल्हा असून, जिल्ह्याच्या ७० टक्के क्षेत्रामध्ये जंगल आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी नागरिकांची उपजीविका या जंगलातील उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे आदिवासी नागरिकांचे अधिकार व समस्या न्यायालयासमक्ष मांडणे आवश्यक आहे, असे नरोटे यांनी नमूद करून याचिकेत मध्यस्थी करण्याची परवानगी मागितली आहे.

विदर्भाकरिता व्याघ्र कॉरिडॉर विदर्भाकरिता व्याघ्र कॉरिडॉर निर्धारित करताना राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचा २०१४ मधील व्याघ्र कॉरिडॉर अहवाल आणि निर्णय समर्थन प्रणाली या दोनच गोष्टी विचारात घेतल्या जातील, असा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाने १७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे. नरोटे यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. मंडळाने व्यापक जनहित पाहून हा निर्णय घेतला आहे. निर्णय कायदेशीर आहे. निर्णय घेताना वन्यजीव संरक्षण कायद्याचे काटेकोर पालन करण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे. हा निर्णय वन्यजीवांच्या हिताचा नाही, असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणावर येत्या ४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

अयोग्य कॉरिडॉरमुळे विकास रखडला

  • यापूर्वी व्याघ्र कॉरिडॉर अयोग्य पद्धतीने निर्धारित करण्यात आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास रखडला. विकास प्रकल्पांकरिता वन्यजीव मंडळाची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे.
  • परिणामी, पक्के रोड, वीज २ वाहिन्या, सिंचन इत्यादी पायाभूत प्रकल्प रखडले आहेत. पक्के रोड नसल्याने पावसाळ्यामध्ये अनेक गावांचा मुख्य क्षेत्रापासून संपर्क तुटतो. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र कॉरिडॉर निश्चित करताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे, याकडेही डॉ. नरोटे यांनी लक्ष वेधले आहे.
टॅग्स :nagpurनागपूर