गावागावांत चिंता, तरीही कागदावरचा दुष्काळ फक्त २८ गावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST2021-01-08T04:19:33+5:302021-01-08T04:19:33+5:30

नागपूर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना ओल्या दुष्काळाचा आणि पुराचा फटका बसला आहे. गावा-गावांतील शेती यामुळे खंगली आहे. पाहणीसाठी आलेल्या ...

Concern in villages, yet paper famine in only 28 villages | गावागावांत चिंता, तरीही कागदावरचा दुष्काळ फक्त २८ गावांत

गावागावांत चिंता, तरीही कागदावरचा दुष्काळ फक्त २८ गावांत

नागपूर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना ओल्या दुष्काळाचा आणि पुराचा फटका बसला आहे. गावा-गावांतील शेती यामुळे खंगली आहे. पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय चमूपुढेही हे वास्तव प्रगटले होते. असे असतानाही शासनाच्या यंत्रणेने १,७८९ गावांपैकी फक्त २८ गावांतच ५० पैशांच्या आत आणेवारी काढली. त्यामुळे एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्याचे लक्षण दिसत नाही.

नापिकीची सध्या गावा-गावांत चिंता आहे. शेतकरी मदतीसाठी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहे तरीही आकड्यांचा खेळ करून यंत्रणेने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. नागपूर जिल्ह्यात १,९५३ गावे आहेत. त्यातील खरिपाच्या १,८४४ गावांपैकी १,७८९ गावांतील आणेवारी सरकारने काढली. १४ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात एकाही गावात आणेवारी ५० पैशांच्या आत नाही. फक्त मौदा आणि नागपूर (ग्रामीण) या दोन तालुक्यांतील २८ गावांतच आणेवारी ५० पैशांच्या आत दाखविली आहे.

जिल्ह्यात पीक परिस्थिती वाईट आहे. सोयाबीन, धान आणि कापूस ही मुख्य पिके सर्वच ठिकाणी वाया गेली आहेत. सोयाबिनचा पेरा नरखेड, काटोल, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर (ग्रामीण), भीवापूर, कामठी या तालुक्यांत होता. मात्र, पावसाने सर्व पीक वाया गेले. रामटेक, मौदा, कुही, भीवापूर, कामठी, पारशीवणी या तालुक्यात धानाला मोठा फटका बसला आहे तर नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, हिंगणा, उमरेड, भीवापूर, कुही, कामठी, पारशिवणी, नागपूर (ग्रामीण) या कापूस उत्पादक तालुक्यांतही मोठे नुकसान झाले आहे.

...

अशीही फसगत

यंत्रणेने जिल्ह्यातील १,७८९ गावांची पैसेवारी जाहीर केली. त्यात नागपूर (ग्रामीण)तालुक्यातील १४८ पैकी २५ गावात आणि मौदातील १०४ पैकी फक्त ३ गावांतच ५० पैशांच्या आत आणेवारी दाखविली. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाणे जवळपास शक्यच नाही. एकीकडे गावे दुष्काळात दाखवायची, मात्र मदत कशी मिळणार नाही, याचीही दक्षता घ्यायची, असा फसवणुकीचा आणि डोळ्यांत धूळ झोकणारा प्रकार यंत्रणेकडून घडला आहे.

...

तालुकानिहाय पैसेवारी

तालुका - ५० पैशांच्या आत - ५० पैशांच्या वर

नागपूर शहर - ० -०

नागपूर ग्रामीण - २५ -१२३

कामठी - ० - ७५

हिंगणा - ० - १४०

काटोल - ० - १८५

नरखेड - ० - १५५

सावनेर - ० - १३५

कळमेश्वर - ० - १०७

रामटेक - ० - १५२

पारशिवणी - ० - ११४

मौदा - ३ - १०४

उमरेड - ० - १८५

भीवापूर - ० - १२१

कुही - ० - १६२

...

Web Title: Concern in villages, yet paper famine in only 28 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.