शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना सात वर्षापासून धुळखात; जागृत नागरिक मंचने वेधले लक्ष

By निशांत वानखेडे | Updated: October 18, 2023 18:47 IST

ऐतिहासिक दीक्षाभूमीसोबत शांतिवन चिचोली, कामठी, रामटेक व इतर महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळांना जोडून बुद्धिस्ट सर्किट तयार करण्याची प्रस्ताव २०१६ साली तयार झाला होता.

नागपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमीसोबत शांतिवन चिचोली, कामठी, रामटेक व इतर महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळांना जोडून बुद्धिस्ट सर्किट तयार करण्याची प्रस्ताव २०१६ साली तयार झाला होता. मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या सात वर्षापासून ही संकल्पना धुळखात पडली आहे. ही संकल्पना पूर्णत्वास येण्यासाठी इतर गोष्टीप्रमाणे यासाठीही आंबेडकरी अनुयायांना आंदोलन करावे लागू नये, याकडे नागपूर जागृत नागरिक मंचने लक्ष वेधले आहे.

मंचचे संयोजक व माजी उपजिल्हाधिकारी आर. एस. आंबुलकर यांनी या संकल्पनेकडे लक्ष वेधले. नागपूर नगरीला प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा दैदिप्यमान वारसा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली घडविलेल्या धर्मातरानंतर ती दिव्यभव्यता पुनश्च प्रदीप्त होत आहे. अशोक विजयादशमीच्या पावनपर्वावर नागपुरात केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लक्षावधी लोक येतात. या अनुयायी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे बुद्धिस्ट सर्किट तयार व्हावे, अशी संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आखली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार नागपूर सुधार प्रन्यासने ९३७.३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून २०१६ साली राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडे पाठविला होता. पुढे नवी दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही झाली. मात्र त्यानंतर हा प्रस्ताव धुळखात पडला असल्याचे आंबुलकर म्हणाले. डॉ. मुकुंद मेश्राम, पुरुषोत्तम गायकवाड, डी. एम. बेलेकर, हुकुमचंद मेश्राम, प्रकाश सोनटक्के, दिलीप पाटील, राजुकमार मेश्राम, मनोहर गजभिये, हरिष जानोरकर, लहानू बन्सोड, राजेंद्र टेंभुर्णे, रमेश ढवळे, भीमराव म्हैसकर आदी मंचच्या सदस्यांनी ही संकल्पना लवकरात लवकर पुर्णत्वास यावी, अशी मागणी केली.

त्यावेळी झालेल्या घडामोडी

  • - पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत २६ ऑगस्ट २०१६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यटन समितीची बैठक.
  • - बैठकीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस कामठी, शांतिवन चिचोली आदी स्थळांचा बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत विकास व्हावा असे ठरले.
  • - पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार नासुप्रने ९३७.३८ कोटींचा प्रस्ताव तयार करून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना ६ सप्टेंबर २०१६ रोजीच्या पत्राद्वारे पाठविला.
  • - ७ सप्टेंबर २०१६ रोजी नवी दिल्ली येथे नितीन गडकरींच्या निवासस्थानी बैठक झाली.
  • - पर्यटन विभागाने दखल घेत नियुक्त केलेल्या सल्लागारांनी तिन्ही स्थळांची पाहणी केली.
  • - ९ सप्टेंबर २०१९ राेजीच्या पत्राद्वारे पर्यटन संचालनालयाने नासुप्रला अतिरिक्त माहिती मागविली. नासुप्र सभापती यांनी ती सादर केली.
  • - यानंतर पुढे काय झाले, ते कळण्यास मार्ग नसल्याचे आंबुलकर म्हणाले.
टॅग्स :nagpurनागपूर