शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई उपाययोजना ३० जूनपूर्वी पूर्ण करा : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:42 IST

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देपाणीटंचाई कृती आराखड्यानुसार २,३३८ उपाययोजनाआवश्यकतेनुसार तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठाटंचाई आराखड्यासाठी आवश्यकतेनुसार निधीची उपलब्धताशहरातील भूजलाचे सर्वेक्षण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.बचत भवन सभागृहात नागपूर शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंंचाईसंदर्भात आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आ. समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, गिरीश व्यास, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात केवळ ९६ दलघमी एवढाच म्हणजे ५.४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तोतलाडोह प्रकल्पात मृत जलसाठा असून, त्यामधून नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केल्या. ते म्हणाले, नवेगाव खैरी पेंच प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असताना महापालिकेने पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शहरातील अवैध नळ कनेक्शन आणि वाणिज्य व औद्योगिक वापरासाठी दिलेल्या पाण्यासंदर्भात तपासणी करून अवैधपणे पाणी वापरणाऱ्याविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.नागपूर शहराला ७१० दलघमी दररोज पाणीपुरवठा होत असून, या पाण्याचे योग्य वितरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच महापालिका क्षेत्रातील ५,२५४ विंधन विहिरींवर हातपंप लावणे, ७५५ विहिरींपैकी २६१ विहिरींची दुरुस्ती करून त्यावरसुद्धा लघु नळ योजना सुरू करण्यात आली आहे. शहरात ३४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये विहिरी स्वच्छ करणे, विद्युत पंप बसविणे आदी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी झोननिहाय पाणीटंचाई निवारण कक्ष तयार करावे. या कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात याव्यात. त्यासोबत अवैधपणे पाणी घेणाऱ्याविरुद्ध तसेच विद्युत पंपाविरुद्ध विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केल्या.अंमलबजावणीची जबाबदारी या अधिकाऱ्यांवरटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजना तात्काळ पूर्ण कराव्यात, असे निर्देश यावेळी दिले. विधानसभा मतदार संघनिहाय पाणीटंचाई कृती आराखड्याचा आढावा घेताना आ. मल्लिकार्जुन रेड्डी, समीर मेघे, सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव प्राधान्याने सादर करावेत. या प्रस्तावांना तात्काळ मंजूर करुन ही कामेसुद्धा निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.नगरपालिका क्षेत्रात १० नगरपालिकांमध्ये २८, खासगी व १३ नगर पालिकांचे असे ४२ टँकर सुरू आहेत. तसेच वाडी नगर परिषद क्षेत्रात ३० विंधन विहिरी, कळमेश्वर- ६, रामटेक- ८, वानाडोंगरी- १३, भिवापूर-१७ तर मोवाड नगरपालिका क्षेत्रात विंधन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यासोबतच टंचाई परिस्थिती असलेल्या नगरपालिकांना पिण्याच्या पाण्याच्या आवश्यक उपाययोजना लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेwater scarcityपाणी टंचाई