शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाणीटंचाई उपाययोजना ३० जूनपूर्वी पूर्ण करा : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:42 IST

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देपाणीटंचाई कृती आराखड्यानुसार २,३३८ उपाययोजनाआवश्यकतेनुसार तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठाटंचाई आराखड्यासाठी आवश्यकतेनुसार निधीची उपलब्धताशहरातील भूजलाचे सर्वेक्षण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १२८४ गावांसाठी पाणीटंंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या २,३३८ उपाययोजनांपैकी नवीन विंधन, नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे सर्व उपाययोजनांची कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.बचत भवन सभागृहात नागपूर शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंंचाईसंदर्भात आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आ. समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, गिरीश व्यास, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात केवळ ९६ दलघमी एवढाच म्हणजे ५.४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तोतलाडोह प्रकल्पात मृत जलसाठा असून, त्यामधून नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केल्या. ते म्हणाले, नवेगाव खैरी पेंच प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असताना महापालिकेने पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शहरातील अवैध नळ कनेक्शन आणि वाणिज्य व औद्योगिक वापरासाठी दिलेल्या पाण्यासंदर्भात तपासणी करून अवैधपणे पाणी वापरणाऱ्याविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.नागपूर शहराला ७१० दलघमी दररोज पाणीपुरवठा होत असून, या पाण्याचे योग्य वितरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच महापालिका क्षेत्रातील ५,२५४ विंधन विहिरींवर हातपंप लावणे, ७५५ विहिरींपैकी २६१ विहिरींची दुरुस्ती करून त्यावरसुद्धा लघु नळ योजना सुरू करण्यात आली आहे. शहरात ३४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये विहिरी स्वच्छ करणे, विद्युत पंप बसविणे आदी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी झोननिहाय पाणीटंचाई निवारण कक्ष तयार करावे. या कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात याव्यात. त्यासोबत अवैधपणे पाणी घेणाऱ्याविरुद्ध तसेच विद्युत पंपाविरुद्ध विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केल्या.अंमलबजावणीची जबाबदारी या अधिकाऱ्यांवरटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजना तात्काळ पूर्ण कराव्यात, असे निर्देश यावेळी दिले. विधानसभा मतदार संघनिहाय पाणीटंचाई कृती आराखड्याचा आढावा घेताना आ. मल्लिकार्जुन रेड्डी, समीर मेघे, सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव प्राधान्याने सादर करावेत. या प्रस्तावांना तात्काळ मंजूर करुन ही कामेसुद्धा निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.नगरपालिका क्षेत्रात १० नगरपालिकांमध्ये २८, खासगी व १३ नगर पालिकांचे असे ४२ टँकर सुरू आहेत. तसेच वाडी नगर परिषद क्षेत्रात ३० विंधन विहिरी, कळमेश्वर- ६, रामटेक- ८, वानाडोंगरी- १३, भिवापूर-१७ तर मोवाड नगरपालिका क्षेत्रात विंधन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यासोबतच टंचाई परिस्थिती असलेल्या नगरपालिकांना पिण्याच्या पाण्याच्या आवश्यक उपाययोजना लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेwater scarcityपाणी टंचाई