शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या कोचच्या स्वच्छतेसंदर्भात रोज येत आहे तक्रारींचा पाऊस

By नरेश डोंगरे | Updated: April 3, 2025 18:47 IST

रेल मदत पोर्टल : १,१९० तक्रारी अस्वच्छतेच्या : रिस्पॉन्स टाईम १८ मिनिटांचा

नरेश डोंगरे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेला चकाचक ठेवण्यासंबंधाने रोज मोठमोठे दावे केले जातात. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. रेल्वेचे कोच आणि प्रसाधने अस्वच्छ आणि घाणेरडे असतात आणि रेल्वे प्रवाशांकडून स्वच्छतेबाबत रोज त्या संबंधाने रेल्वे पोर्टलवर तक्रारीचा पाऊस पडतो. प्रवाशांच्या हाकेला ओ देणाऱ्या 'रेल मदत' या रेल्वे पोर्टलवरूनच ही अधिकृत माहिती उघड झाली आहे.

प्रवासी सेवा-सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या अडीअडचणी, तक्रारी ऐकून घेण्यासाठी रेल्वेने 'रेल मदत पोर्टल' सुरू केले आहे. या पोर्टलवर येणाऱ्या तक्रारीचे रेल्वे प्रशासनाकडून निराकरण केले जाते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गेल्या वर्षभरात रेल मदत पोर्टलवर ३८,२०६ तक्रारी आल्या. त्यातील सर्वाधिक १,१९० तक्रारी रेल्वेच्या कोचमधील स्वच्छतेसंबंधातील आहे. यावरून रेल्वे गाड्यांमधील स्वच्छतेचे चित्र कसे असेल त्याची कल्पना येते.रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार, पोर्टलवर तक्रार आल्यानंतर जास्तीत जास्त १८ मिनिटांत संबंधित प्रवाशाला प्रतिसाद मिळतो आणि २२ मिनिटात त्या तक्रारीचे निराकरण करून संबंधित प्रवाशाचे समाधान करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असा दावाही रेल्वे प्रशासनाने केला आहे. प्रवाशांनी या सेवेला उत्कृष्ट रेटिंग दिले असून, त्यातून सकारात्मक प्रतिसाद अधोरेिखत होतो, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

तुलनेत स्थानकावरची स्वच्छता चांगलीरेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये चांगली स्वच्छता ठेवून 'उच्च स्वच्छता मानके राखण्याचा मुख्य उद्देश रेल मदत पोर्टलचा आहे. उपलब्ध माहितीनुसार, पोर्टलवर आलेल्या ३८,२०६ तक्रारींपैकी विविध रेल्वे स्थानकावरच्या स्वच्छतेबाबत केवळ ८३ तक्रारी आल्या आहेत. अर्थात कोच पेक्षा किती तरी जास्त पट रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी असते. मात्र, कोचच्या तुलनेत रेल्वे स्थानकावरची साफसफाई, स्वच्छता चांगली असते, हे यातून स्पष्ट होते.

हेल्पलाईनवरही करा तक्रारप्रवाशांच्या तक्रारी जलद गतीने सोडवल्या जाव्यात यासाठी भारतीय रेल्वे 'रेल मदत पोर्टल' अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरे म्हणजे, प्रवासी त्यांच्या तक्रारी, सूचना रेल मदत अॅप सोबतच, १३९ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारेदेखिल नोंदवू शकतात. प्रवासी सुरक्षा, स्वच्छता, केटरिंग आणि सेवा सुधारणेला प्राधान्य देऊन रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यास प्रशासन प्रयत्नशिल असल्याचा दावाही रेल्वेने केला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर