शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबत राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:22 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे.

ठळक मुद्देकुलसचिवपदाच्या निवड प्रक्रियेवरुन तापले वातावरणखर्च कुलगुरूंकडून वसूल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे. डॉ. नीरज खटी यांचा ‘प्रोबेशन’ कालावधी पूर्ण झाला नसल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना होती. तरीदेखील त्यांची अगोदर निवड करणे व त्यानंतर त्यांना ‘लिन’ नाकारणे हा प्रक्रार करण्यात आला. यामुळे विद्यापीठाचा बहुमूल्य वेळ व पैसा वाया गेला आहे. या निवड प्रक्रियेचा पूर्ण खर्च कुलगुरूंकडूनच वसूल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कुलसचिवपदाच्या निवडीसाठी विद्यापीठात सात महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती. अखेर निवड समितीने डॉ. नीरज खटी यांची निवड केली. यानंतर प्रशासनावर राजकीय दबावदेखील आला. ‘लिन’ मिळू शकणार नसल्याने डॉ. खटी यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुलगुरूंना डॉ. खटी यांच्यासंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्ण माहिती होती. अशास्थितीत निवड झाल्यानंतर हे मुद्दे कसे काय उपस्थित झाले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुनील मिश्रा यांनी या मुद्यावरून कुलगुरूंचीच तक्रार राज्यपालांकडे केली आहे. डॉ. नीरज खटी यांची ‘लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट आॅफ टेक्नॉलॉजीह्णमध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्रोफेसर म्हणून निवड करण्यात आली. ‘लिन’संदर्भातील नियमांची डॉ. खटी व डॉ. काणे या दोघांनाही माहिती होती. तरीदेखील त्यांचा अर्ज छाननी समितीने ग्राह्य धरला व त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. यानंतर त्यांची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खुद्द कुलगुरू यांनीच निवड केली. नियुक्तीनंतर डॉ. खटी यांना ‘लिनह्ण नाकारून ते पद त्यांनी स्वीकारू नये, अशी व्यवस्था केली. यातूनच हा प्रकार जाणीवपूर्वक झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च झाला. हा सर्व खर्च जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या निधीतून झाला आहे. त्यामुळे हा पैसा कुलगुरूंकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मिश्रा यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ