शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

व्यावसायिक सिनेमा चोरून गुंगीचे औषध दिल्यासारखा; मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:34 AM

व्यावसायिक सिनेमा चोरून गुंगीचे औषध दिल्यासारखा झाला आहे, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘अस्तु’ सिनेमाचे स्क्रिनिंग व मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिनेमा संपल्यानंतर त्यातला विषय डोक्यातून जात नाही. तो विचार अस्वस्थ करतो, कुणाला तरी बोलावस वाटते, तोच चांगला सिनेमा. दुर्दैवाने गल्लाभरू सिनेमाला महत्त्व देणारे व्यावसायिक वितरक असे चांगले चित्रपट स्वीकारत नाही. लोकांना आवडणार नाही हेही तेच ठरवतात. अशा गल्लाभरू चित्रपटांमधून चुकीची माहिती लोकांपर्यंत जाते. कुठलाही मानसिक आघात झाला की स्मृती जाते, अशी गैरसमज पसरविणारी माहिती मोठे स्टार असलेल्या कमर्शियल चित्रपटांंमधून समाजात रुजविली गेली आहेत. याच वृत्तीमुळे डोक घरी ठेवून केवळ करमणूक म्हणून सिनेमाला जाण्याला महत्त्व आले आहे. व्यावसायिक सिनेमा चोरून गुंगीचे औषध दिल्यासारखा झाला आहे, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय मेंदूदिनानिमित्त इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरालॉजी, नागपूर न्यूरो सोसायटी, सायकॅट्रिक सोसायटी व आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनच्यावतीने ‘अस्तु’ या मराठी चित्रपटाचा खास शो व डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टीम येथे आयोजित करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘अस्तु’ चित्रपटासह विविध विषयांवर मत व्यक्त केले. शिक्षण हे ज्ञानासाठी असते हेच आपण विसरत चाललो आहोत. त्याऐवजी मार्क्स आणि पदवी मिळविणे महत्त्वाचे झाले आहे. जगाच्या पाठीवर कोणतेही ज्ञान अनुभवातून येते. डिजिटल क्रांतीमुळे समाज व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाची भाषा ही व्यवसायासाठी झाली आहे. कुणी आपल्याला गंडवू नये म्हणून नाईलाजाने ही भाषा शिकणे प्रत्येकासाठी आवश्यक झाले. आजची शिक्षण व्यवस्था अक्षर लिहायला, वाचायला शिकवते. पण एखाद्या बाबीकडे पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची प्रगल्भता देत नाही. डोळे, कान, नाक, त्वचा, मन, बुद्धी ही संवेदनेची सेंसर्स त्यामुळे बधीर होत आहेत.भावना, सेवा देखील सामाजिक झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या घरात डोकावून पाहण्यासाठी कुणालाच वेळ नाही. त्यामध्ये सिनेमाही कलुषित झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहात मानसिक ताण सोडून जाणाऱ्याचे प्रमाण अगणित आहे. मानवी भावना समृद्ध करणारा सिनेमा दुर्मिळ होतोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. मोहन आगाशे यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट व कल्चरल फाऊंडेशनचे संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.अस्तु हा सिनेमा अल्झाईमर (स्मृतिभ्रंश) या आजाराबाबतचे सत्य मांडणारा आहे. यात नात्यांची गुंतागुंत व ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन यावरही विचार होतो. कोणत्याही आजारात काळजी व सेवा महत्त्वाची असते, हा केंद्रबिंदू यात आहे. चित्रपट तयार करण्यासाठी स्वत:चा पीएफचा पैसा यात गुंतविला. मात्र कमर्शियल नसल्याने वितरक हा सिनेमा स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडलेला हा विषय समाजापर्यंत पोहचावा, यासाठी विशेष शोचे आयोजन करून तो पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.सध्या मार्केटींगला महत्त्व आले आहे. यामुळे हा आजार, त्यामुळे तो आजार होतो असे सांगून जगण्याचेही मार्के टींग व मृत्यूची भीती दाखविली जाते आहे. योग्य वेळी व आनंदाने मरणासाठी आनंदाने जगणे आवश्यक आहे. ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे आणि हेच सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशे