शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:15 IST

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी विचार मंच : साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांचे चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे. घटनेच्या विरोधात पावले उचलली जात आहेत. ही परिस्थिती पाहता लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांना आता पुढाकार घेत एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे चिंतावजा मत साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी विचार मंचतर्फे ‘भारतातील प्रचलित परिस्थिती आणि नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर शनिवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे होत्या. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रा. भाऊ लोखंडे, हरिभाऊ केदार, प्रा. जैमिनी कडू, ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे, शबीर अहमद विद्रोही, मा.म.गडकरी आणि नागेश चौधरी उपस्थित होते.या वेळी हरिभाऊ केदार यांनी गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येवर चिंता व्यक्त करीत समाजव्यवस्था बदलण्याचा हा प्रयत्न रोखण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी यांनी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाकडे कुणाचेच लक्ष नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचे मान्य केले. ही स्थिती बदलण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. साहित्यिक नागेश चौधरी म्हणाले, आरएसएसची नीती चालविण्यासाठी मोदींना प्यादा बनविण्यात आले आहे. हिंदूराष्टÑ बनविण्याच्या प्रयत्नामुळे देशात अराजकता पसरल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ साहित्यिक जैमिनी कडू यांनी भाजपा हा आरएसएसचा मुखवटा असल्याचा आरोप करीत भाजपात कर्तबगार नेता नसल्याची केविलवाणी स्थिती असल्याचे सांगितले. अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, गांधीजींच्या विचारांना छेद दिला जात आहे. मजूर, शेतमजूर, कामगार मरत आहते. शहिदांचा अपमान केला जात आहे. अशास्थितीत निर्णयाची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, श्रीरामाचे नाव घेऊन देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. चरख्याच्या मागे बसून कोणी महात्मा गांधी होत नाही. महात्मा गांधींचे विचार मानवतेकडून विकासाकडे नेणारे आहेत. ते संपविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे कॉँग्रेसने एकवटण्याची वेळ आली आहे.