शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:15 IST

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी विचार मंच : साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांचे चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे. घटनेच्या विरोधात पावले उचलली जात आहेत. ही परिस्थिती पाहता लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांना आता पुढाकार घेत एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे चिंतावजा मत साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी विचार मंचतर्फे ‘भारतातील प्रचलित परिस्थिती आणि नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर शनिवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे होत्या. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रा. भाऊ लोखंडे, हरिभाऊ केदार, प्रा. जैमिनी कडू, ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे, शबीर अहमद विद्रोही, मा.म.गडकरी आणि नागेश चौधरी उपस्थित होते.या वेळी हरिभाऊ केदार यांनी गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येवर चिंता व्यक्त करीत समाजव्यवस्था बदलण्याचा हा प्रयत्न रोखण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी यांनी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाकडे कुणाचेच लक्ष नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचे मान्य केले. ही स्थिती बदलण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. साहित्यिक नागेश चौधरी म्हणाले, आरएसएसची नीती चालविण्यासाठी मोदींना प्यादा बनविण्यात आले आहे. हिंदूराष्टÑ बनविण्याच्या प्रयत्नामुळे देशात अराजकता पसरल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ साहित्यिक जैमिनी कडू यांनी भाजपा हा आरएसएसचा मुखवटा असल्याचा आरोप करीत भाजपात कर्तबगार नेता नसल्याची केविलवाणी स्थिती असल्याचे सांगितले. अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, गांधीजींच्या विचारांना छेद दिला जात आहे. मजूर, शेतमजूर, कामगार मरत आहते. शहिदांचा अपमान केला जात आहे. अशास्थितीत निर्णयाची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, श्रीरामाचे नाव घेऊन देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. चरख्याच्या मागे बसून कोणी महात्मा गांधी होत नाही. महात्मा गांधींचे विचार मानवतेकडून विकासाकडे नेणारे आहेत. ते संपविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे कॉँग्रेसने एकवटण्याची वेळ आली आहे.