शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:15 IST

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी विचार मंच : साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांचे चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून सर्वसमावेशक विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकप्रकारे गांधीवादी विचारांना संपविण्याचा प्रयत्न होत असून हिंदूराष्टÑ बनविण्याचा धोका वाढला आहे. घटनेच्या विरोधात पावले उचलली जात आहेत. ही परिस्थिती पाहता लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांना आता पुढाकार घेत एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे चिंतावजा मत साहित्यिक, लेखक, पत्रकार, गांधीवाद्यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी विचार मंचतर्फे ‘भारतातील प्रचलित परिस्थिती आणि नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर शनिवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे होत्या. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रा. भाऊ लोखंडे, हरिभाऊ केदार, प्रा. जैमिनी कडू, ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे, शबीर अहमद विद्रोही, मा.म.गडकरी आणि नागेश चौधरी उपस्थित होते.या वेळी हरिभाऊ केदार यांनी गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येवर चिंता व्यक्त करीत समाजव्यवस्था बदलण्याचा हा प्रयत्न रोखण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी यांनी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाकडे कुणाचेच लक्ष नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचे मान्य केले. ही स्थिती बदलण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. साहित्यिक नागेश चौधरी म्हणाले, आरएसएसची नीती चालविण्यासाठी मोदींना प्यादा बनविण्यात आले आहे. हिंदूराष्टÑ बनविण्याच्या प्रयत्नामुळे देशात अराजकता पसरल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ साहित्यिक जैमिनी कडू यांनी भाजपा हा आरएसएसचा मुखवटा असल्याचा आरोप करीत भाजपात कर्तबगार नेता नसल्याची केविलवाणी स्थिती असल्याचे सांगितले. अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, गांधीजींच्या विचारांना छेद दिला जात आहे. मजूर, शेतमजूर, कामगार मरत आहते. शहिदांचा अपमान केला जात आहे. अशास्थितीत निर्णयाची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, श्रीरामाचे नाव घेऊन देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. चरख्याच्या मागे बसून कोणी महात्मा गांधी होत नाही. महात्मा गांधींचे विचार मानवतेकडून विकासाकडे नेणारे आहेत. ते संपविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे कॉँग्रेसने एकवटण्याची वेळ आली आहे.