शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

शहराच्या एका टोकावर कॉलेज, दुसऱ्या टोकावर वसतीगृह; स्थानांतरणाविरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण

By निशांत वानखेडे | Updated: July 5, 2023 17:08 IST

विभागाकडून कारवाईचा इशारा

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने दाभा येथे चालविण्यात येणारे वसतीगृह चिंचभवनला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसतीगृह देण्याची मागणी करीत एका टोकावर कॉलेज अन् दुसऱ्या टोकावर वसतीगृह कसे चालेल, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

दाभा व दिघोरी येथे भाड्याच्या इमारतीत समाज कल्याणचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांचे वसतीगृह आहे. ही दोन्ही वसतीगृहामध्ये पावसाळ्यात पाणी साचते. तळमजल्यावर असलेल्या भोजनगृहात पाणी साचत असल्याने मुलांना त्रास होतो. त्यामुळे दोन्ही वसतीगृह चिंचभवनला स्थानांतरित करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. याला विद्यार्थ्यांनी विरोध केला व उपोषण सुरू केले.

विद्यार्थ्यांच्या मते याच भागात दुसऱ्या वसतीगृहातही हीच समस्या असताना त्याला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. शिवाय चिंचभवनचे वसतीगृह निर्जन स्थळी असल्याने सुरक्षेचा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. अनेक विद्यार्थ्यांची महाविद्यालये काटोल नाका परिसरात आहेत. शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे कोर्सेसही करावे लागतात. दुसऱ्या टोकाच्या वसतीगृहात गेल्यास विद्यार्थ्यांना प्रवासाचा खुप जास्त त्रास होईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे एकतर आहे त्याच भागात किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात वसतीगृह द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे दिघोरी व बहादूरा येथील इमारत सुद्धा चिंचभवन, खापरी नाका येथे स्थलांतरित करण्याचा आदेश आहे. त्याऐवजी दिघोरी परिसरातच मोठी इमारत समाज कल्याण का घेत नाही, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीagitationआंदोलनnagpurनागपूर