शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

शहराच्या एका टोकावर कॉलेज, दुसऱ्या टोकावर वसतीगृह; स्थानांतरणाविरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण

By निशांत वानखेडे | Updated: July 5, 2023 17:08 IST

विभागाकडून कारवाईचा इशारा

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने दाभा येथे चालविण्यात येणारे वसतीगृह चिंचभवनला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसतीगृह देण्याची मागणी करीत एका टोकावर कॉलेज अन् दुसऱ्या टोकावर वसतीगृह कसे चालेल, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

दाभा व दिघोरी येथे भाड्याच्या इमारतीत समाज कल्याणचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांचे वसतीगृह आहे. ही दोन्ही वसतीगृहामध्ये पावसाळ्यात पाणी साचते. तळमजल्यावर असलेल्या भोजनगृहात पाणी साचत असल्याने मुलांना त्रास होतो. त्यामुळे दोन्ही वसतीगृह चिंचभवनला स्थानांतरित करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. याला विद्यार्थ्यांनी विरोध केला व उपोषण सुरू केले.

विद्यार्थ्यांच्या मते याच भागात दुसऱ्या वसतीगृहातही हीच समस्या असताना त्याला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. शिवाय चिंचभवनचे वसतीगृह निर्जन स्थळी असल्याने सुरक्षेचा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. अनेक विद्यार्थ्यांची महाविद्यालये काटोल नाका परिसरात आहेत. शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे कोर्सेसही करावे लागतात. दुसऱ्या टोकाच्या वसतीगृहात गेल्यास विद्यार्थ्यांना प्रवासाचा खुप जास्त त्रास होईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे एकतर आहे त्याच भागात किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात वसतीगृह द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे दिघोरी व बहादूरा येथील इमारत सुद्धा चिंचभवन, खापरी नाका येथे स्थलांतरित करण्याचा आदेश आहे. त्याऐवजी दिघोरी परिसरातच मोठी इमारत समाज कल्याण का घेत नाही, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीagitationआंदोलनnagpurनागपूर