शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाणे टंचाई, व्यापारी त्रस्त

By admin | Updated: April 26, 2015 02:24 IST

नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आल्याचे बाजारात चित्र आहे.

नागपूर : नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आल्याचे बाजारात चित्र आहे. नाणे टंचाईला व्यापारी वैतागले असून काहीजण टक्केवारीने नाण्यांचा काळाधंदा करीत आहेत. भयानक नाणे टंचाईचा फायदा घेत काही मंडळी नाण्यांची टक्केवारीने विक्री करीत आहेत. त्यांचा नाणे विक्रीचा एक स्वतंत्र व्यवसायच बनला आहे. ही मंडळी विविध देवस्थान, भिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साचलेली नाणी मिळवितात. नाणेनुसार वेगळी करून १०० रुपये किमतीच्या थैल्या बनवितात. व्यापाऱ्यांना नाण्यांची गरज भासते हे लक्षात घेऊन अशा व्यापाऱ्यांना ही मंडळी नाण्यांची थैली १० ते २० टक्के दर आकारून विकत देतात. असा हा काळाधंदा शहरात राजरोजपणे चालू आहे. आता ५० पैशालाही फारशी किंमत उरली नाही. नाण्यांसह नोटांच्या बाबतीतही तसेच घडले. एक आणि दोन रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर गेल्या, तर पाच रुपयांची नोट जरी अस्तित्वात असली तरी या नोटा अनेक वर्षांपासून रिझर्व्ह बँकेकडून नव्या कोऱ्या करकरीत स्वरूपात येणे बंद झाले. त्यामुळे पाच रुपयांच्या जुन्या फाटक्या नोटा पुन्हा पुन्हा बाजारात फिरू लागल्या.रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा कोषागार शाखेला वर्षांतून तीन वेळा नवीन नोटा आणि नाण्यांचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे, हजार रुपये मूल्य असलेल्या नवीरन नोटा सातत्याने चलनात येत असतात. त्याचप्रमाणे एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयांच्या नवीन नाण्यांचा वर्षांतून तीन वेळा पुरवठा केला जातो, अशी परिस्थिती असतानाही बाजारपेठेत चिल्लरचा प्रश्न गंभीर का बनला याचा शोध घेतला असता, अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. नवीन नोटा आणि नाणी प्रथमत: जेव्हा बाजारात येतात तेव्हा नाविन्यपूर्ण कुतूहलापोटी चलनात हस्ते, परहस्ते फिरतच नाहीत, उलट त्यांचा संग्रह केला जातो. त्यामुळे आजही आपल्याला बाजारात १० रुपयांची नवीन नाणी चलनात येऊनसुद्धा पाहायला मिळत नाहीत. विविध मंदिरांच्या दानपेटीत भाविक चिल्लरची नाणी आवर्जून टाकतात. अनेक हॉटेल्समधून चिल्लर नाही, असे कारण सांगून त्याऐवजी चक्क चॉकलेटच ग्राहकांच्या हाती ठेवले जाते. अशा तऱ्हेने नाण्यांच्या टंचाईमुळे चॉकलेटचा धंदाही भरभराटीस आला आहे.नाणे टंचाईचा फटका फक्त ग्राहकांना बसतो असे नव्हे, तर व्यापारीसुद्धा त्रस्त आहेत. नाणे विकत घेऊनसुद्धा ती कधी ना कधी संपते, मग पुन्हा त्यासाठीच त्रस्त व्हावे लागते. जेव्हा १७२ रुपये बिल होते तेव्हा व्यापारी वरचे २ रुपये कमी करून ग्राहकांकडून १७० रुपये घेतात. अशा प्रकारे आपला माल विकताना चिल्लरअभावी केवळ ग्राहक समाधानासाठी व्यापाऱ्यांना तडजोड करावी लागते. चिल्लरची कटकट कायमची दूर होण्यासाठी एकतर सर्व प्रकारचे भाडे, मालाच्या किमती पूर्णांकात ठेवण्यात याव्यात किंवा रिझर्व्ह बँकेकडून चिल्लर मोठ्या प्रमाणात वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी, अशी व्यापारी आणि ग्राहकांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)