शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 21:45 IST

प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्दे ‘सायकल ट्रॅक’ संकल्पना सत्यात यावीफिटनेस व प्रदूषणमुक्तीचाही मंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये नागपूर शहर चौथ्या क्रमांकावर आहे आणि यात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषण‘चा वाटा १७.२ टक्के एवढा आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही केवळ प्रदूषण कमी करण्यासाठी नाही तर फिटनेससाठीही महत्त्वाची आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक राहुल सावंत यांनी दिली.

जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून राजधानी दिल्लीची ओळख होती पण ती आता पुसली जात आहे. लॉकडाऊन राजधानीसाठी लाभदायक ठरला. मात्र एवढ्यावरच न थांबता आता दिल्लीमध्ये ‘सायकल मेयर’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. किमान शनिवार व रविवारी मोटर वाहनाऐवजी केवळ सायकल वापरण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. ही संकल्पना नागपूर शहरानेही स्वीकारण्याची गरज आहे. राहुल सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या मेट्रो रेल्वेच्या प्लॅनमध्ये ‘डेडिकेटेड सायकल ट्रॅक व पार्किंग’ या संकल्पनेचा समावेश आहे. त्यानुसार प्रत्येक स्टेशनवर सायकल पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र लोकांचा प्रतिसाद नसल्याने सायकल ट्रॅकचे नियोजन फिस्कटले आहे.विशेष म्हणजे नवी मुंबई व खारघर येथे सायकल ट्रॅकची संकल्पना राबविली आहे आणि सायनसह इतर भागात ती प्रस्तावित आहे. मग नागपूरला का नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे नागपूरकर सायकल वापराबाबत जागरूक नाहीत, असा अर्थ निघतो. थोड्या थोड्या अंतरावरही पायी किंवा सायकलचा उपयोग न करता ‘मोटर’ वाहन काढले जाते. यामुळे प्रदूषणाचा स्तरही वाढला आहे. विशेष म्हणजे शहराच्या ‘शुद्ध हवा नियोजनात’ ‘डेडिकेटेड सायकल ट्रॅक’चा समावेश आहे. महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या कृती समितीला तो मूर्तरूपात आणायचा आहे. मात्र त्यांच्याकडून ते होणार याबाबत शंका आहे पण नागरिकांनी ठरवले आणि मागणी केली तरच ते शक्य होऊ शकेल. मात्र ‘सायकल केंद्रित’ जीवनशैलीसाठी लोकांनी आग्रही असले पाहिजे, हे महत्वाचे आहे.वातावरणातील प्रदूषण काढणे शक्य नाही. पावसाने ते जमिनीवर बसेल पण त्यातून माती व जलप्रदूषण होईल. मात्र गाड्यांचा वापर कमी करून प्रदूषण उत्सर्जन कमी करणे आपल्या हाती आहे. त्यासाठी कमी अंतरासाठी सायकलीचा उपयोग हा सर्वोत्तम पर्याय आहे. यातून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल व आरोग्यही सुदृढ राहील.- राहुल सावंत, वातावरण फाउंडेशन

 

 

टॅग्स :Cyclingसायकलिंग