शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

नागपूर जिल्ह्यातही कॉलराची ‘एन्ट्री’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 08:00 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देडायरियाचे आठ, तर गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

सुमेध वाघमारे

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच डोंगरी आणि कोयरी या गावात ‘कॉलरा’मुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा जलजन्य आजाराची भीती व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले. या संख्येवरून घाबरण्याचे कारण नसलेतरी खबरदारी घेण्याचा आवाहन केले जात आहे.

सध्या सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी व ग्रामीण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, धरणे, विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. यातूनच जलजन्य आजार वाढून आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- ८० टक्के आजार दूषित पाण्यामुळे

पाण्याच्या दूषितपणात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा जलाशयातील जीवजंतूंवरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. जवळपास ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. यामुळे पाण्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

-मे २०२२पर्यंत गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात २०२०मध्ये कॉलराचा एकही रुग्ण नव्हता. परंतु २०२१ मध्ये ३ तर, मे २०२२पर्यंत तीन रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये डायरियाचे ४७ रुग्ण आढळून आले असताना २०२१ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या १५७ पोहचली. यावर्षी मेपर्यंत आठ रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १६१ असताना, २०२१मध्ये केवळ ४, तर मे २०२२पर्यंत ५५ रुग्ण आढळून आले. २०२० मध्ये टायफाइडचे तीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मे २०२०पर्यंत आरोग्य विभागाकडे एकाही रुग्णांची नोंद नाही.

-कॉलरा अत्यंत वेगाने पसरू शकतो

पटकी म्हणजे ‘कॉलरा’ हा दूषित पाण्यामुळे पसरणारा जलजन्य आजार आहे. कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरू शकतो. इतर कोणत्याही जलजन्य आजाराच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. जुलाब व उलट्या हे या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य उपचाराअभावी जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.

- पाणी उखळून, गाळून व थंड करूनच प्या

दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी आजार प्रामुख्याने होतात. हे होऊ नयेत यासाठी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे. घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वच्छ धुवा व हाताची स्वच्छता ठेवा.

-डॉ. वनिता जैन, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

 

टॅग्स :Healthआरोग्य