शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातही कॉलराची ‘एन्ट्री’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 08:00 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देडायरियाचे आठ, तर गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

सुमेध वाघमारे

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच डोंगरी आणि कोयरी या गावात ‘कॉलरा’मुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा जलजन्य आजाराची भीती व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले. या संख्येवरून घाबरण्याचे कारण नसलेतरी खबरदारी घेण्याचा आवाहन केले जात आहे.

सध्या सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी व ग्रामीण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, धरणे, विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. यातूनच जलजन्य आजार वाढून आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- ८० टक्के आजार दूषित पाण्यामुळे

पाण्याच्या दूषितपणात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा जलाशयातील जीवजंतूंवरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. जवळपास ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. यामुळे पाण्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

-मे २०२२पर्यंत गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात २०२०मध्ये कॉलराचा एकही रुग्ण नव्हता. परंतु २०२१ मध्ये ३ तर, मे २०२२पर्यंत तीन रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये डायरियाचे ४७ रुग्ण आढळून आले असताना २०२१ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या १५७ पोहचली. यावर्षी मेपर्यंत आठ रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १६१ असताना, २०२१मध्ये केवळ ४, तर मे २०२२पर्यंत ५५ रुग्ण आढळून आले. २०२० मध्ये टायफाइडचे तीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मे २०२०पर्यंत आरोग्य विभागाकडे एकाही रुग्णांची नोंद नाही.

-कॉलरा अत्यंत वेगाने पसरू शकतो

पटकी म्हणजे ‘कॉलरा’ हा दूषित पाण्यामुळे पसरणारा जलजन्य आजार आहे. कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरू शकतो. इतर कोणत्याही जलजन्य आजाराच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. जुलाब व उलट्या हे या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य उपचाराअभावी जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.

- पाणी उखळून, गाळून व थंड करूनच प्या

दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी आजार प्रामुख्याने होतात. हे होऊ नयेत यासाठी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे. घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वच्छ धुवा व हाताची स्वच्छता ठेवा.

-डॉ. वनिता जैन, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

 

टॅग्स :Healthआरोग्य