शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

नागपूर जिल्ह्यातही कॉलराची ‘एन्ट्री’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 08:00 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देडायरियाचे आठ, तर गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

सुमेध वाघमारे

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच डोंगरी आणि कोयरी या गावात ‘कॉलरा’मुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा जलजन्य आजाराची भीती व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले. या संख्येवरून घाबरण्याचे कारण नसलेतरी खबरदारी घेण्याचा आवाहन केले जात आहे.

सध्या सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी व ग्रामीण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, धरणे, विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. यातूनच जलजन्य आजार वाढून आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- ८० टक्के आजार दूषित पाण्यामुळे

पाण्याच्या दूषितपणात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा जलाशयातील जीवजंतूंवरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. जवळपास ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. यामुळे पाण्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

-मे २०२२पर्यंत गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात २०२०मध्ये कॉलराचा एकही रुग्ण नव्हता. परंतु २०२१ मध्ये ३ तर, मे २०२२पर्यंत तीन रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये डायरियाचे ४७ रुग्ण आढळून आले असताना २०२१ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या १५७ पोहचली. यावर्षी मेपर्यंत आठ रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १६१ असताना, २०२१मध्ये केवळ ४, तर मे २०२२पर्यंत ५५ रुग्ण आढळून आले. २०२० मध्ये टायफाइडचे तीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मे २०२०पर्यंत आरोग्य विभागाकडे एकाही रुग्णांची नोंद नाही.

-कॉलरा अत्यंत वेगाने पसरू शकतो

पटकी म्हणजे ‘कॉलरा’ हा दूषित पाण्यामुळे पसरणारा जलजन्य आजार आहे. कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरू शकतो. इतर कोणत्याही जलजन्य आजाराच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. जुलाब व उलट्या हे या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य उपचाराअभावी जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.

- पाणी उखळून, गाळून व थंड करूनच प्या

दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी आजार प्रामुख्याने होतात. हे होऊ नयेत यासाठी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे. घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वच्छ धुवा व हाताची स्वच्छता ठेवा.

-डॉ. वनिता जैन, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

 

टॅग्स :Healthआरोग्य