शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

नागपूर जिल्ह्यातही कॉलराची ‘एन्ट्री’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 08:00 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देडायरियाचे आठ, तर गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

सुमेध वाघमारे

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील पाच डोंगरी आणि कोयरी या गावात ‘कॉलरा’मुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा जलजन्य आजाराची भीती व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यात कॉलराचे आतापर्यंत ३, डायरियाचे आठ तर, गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण आढळून आले. या संख्येवरून घाबरण्याचे कारण नसलेतरी खबरदारी घेण्याचा आवाहन केले जात आहे.

सध्या सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरी व ग्रामीण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, धरणे, विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. यातूनच जलजन्य आजार वाढून आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- ८० टक्के आजार दूषित पाण्यामुळे

पाण्याच्या दूषितपणात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा जलाशयातील जीवजंतूंवरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. जवळपास ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. यामुळे पाण्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

-मे २०२२पर्यंत गॅस्ट्रोचे ५५ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात २०२०मध्ये कॉलराचा एकही रुग्ण नव्हता. परंतु २०२१ मध्ये ३ तर, मे २०२२पर्यंत तीन रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये डायरियाचे ४७ रुग्ण आढळून आले असताना २०२१ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या १५७ पोहचली. यावर्षी मेपर्यंत आठ रुग्णांची नोंद झाली. २०२०मध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १६१ असताना, २०२१मध्ये केवळ ४, तर मे २०२२पर्यंत ५५ रुग्ण आढळून आले. २०२० मध्ये टायफाइडचे तीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मे २०२०पर्यंत आरोग्य विभागाकडे एकाही रुग्णांची नोंद नाही.

-कॉलरा अत्यंत वेगाने पसरू शकतो

पटकी म्हणजे ‘कॉलरा’ हा दूषित पाण्यामुळे पसरणारा जलजन्य आजार आहे. कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरू शकतो. इतर कोणत्याही जलजन्य आजाराच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. जुलाब व उलट्या हे या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य उपचाराअभावी जलशुष्कता होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.

- पाणी उखळून, गाळून व थंड करूनच प्या

दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी आजार प्रामुख्याने होतात. हे होऊ नयेत यासाठी पाणी उखळून, गाळून व थंड करून प्यावे. घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वच्छ धुवा व हाताची स्वच्छता ठेवा.

-डॉ. वनिता जैन, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

 

टॅग्स :Healthआरोग्य