शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

चिरंजीव प्रसाद सांभाळणार नागपूर परीक्षेत्राची जबाबदारी; कोळसा तस्करी अन् अवैध दारू विक्रीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 21:00 IST

सोमवारी सांभाळणार पदभार

 नागपूर: जातीय दंगलीने होरपळून निघू पाहणाऱ्या औरंगाबाद शहराला शांतताप्रिय शहर अशी ओळख देण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसादनागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. राज्य सरकारने आज आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यातून येथील महानिरिक्षक के. एम. प्रसन्ना यांची औरंगाबादला तर औरंगाबादचे आयुक्त प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. सन १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले चिरंजीव प्रसाद २०१८ पासून औरंगाबाद मध्ये पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

जानेवारी  ते मे २०१८ या  कालावधीत भीमा कोरेगांवमुळे औरंगाबाद येथे झालेली दंगल तसेच ११ मे च्या रात्री जुन्या शहरात झालेल्या जातीय दंगलीमुळे शहर होरपळून निघाले होते. या परिस्थितीत पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद रुजू  झाले होते. त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विविध भागात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. बेरोजगार तरुण आणि महिलाना रोजगारभिमुख प्रशिक्षण देउन रोजगार मिळवून देण्याचा एक हाती  कार्यक्रम राबविला. यातून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच पोलीस आणि जनतेतील अविश्वासाची दरी कमी करण्याचीही कामगिरी बजावली. यानंतर छोट्या मोठ्या घटनेचे रूपांतर दंगलीत होणार  नाही, याची काळजी घेतली. यातून  औरंगाबादला शांतताप्रिय शहर म्हणून ओळख मिळवून देण्यात  प्रसाद यशस्वी ठरले. आता ते नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

या क्षेत्रात नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा हे चार जिल्हे येतात. त्यातील चंद्रपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे दारूबंदीचे जिल्हे म्हणून परिचित असले तरी या दोन्ही जिल्ह्यात देशी-विदेशी गावठी आणि बनावट विलायती दारू विकली जाते शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा तस्करीचा ही मोठा गोरख धंदा आहे. या गोरख धंद्याला आळा घालण्याची जबाबदारी प्रसाद यांच्यावर आहे. आपण दोन-तीन दिवसात नागपुरात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारू, असे त्यांनी लोकमत'शी चर्चा करताना सांगितले. परीक्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर प्राधान्याने काय करायचे, ते आपण ठरवू , असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरChiranjiv Prasadचिरंजीव प्रसादMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार