शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बालमजुरी निर्मूलन दिवस; बालकामगारांचे निर्मूलन करणारे जिल्हा कृ ती दल निष्क्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 10:59 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी विशेष कृती दलाची स्थापना केली गेली आहे. पण बालकामगारांप्रति कृती दलाची भूमिका निष्क्रिय आहे.

ठळक मुद्देवर्षभरात कारवाई नाहीबालकांच्या पुनर्वसनाचे, बालकामगार मुक्तीचे जनजागरण नाही

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी विशेष कृती दलाची स्थापना केली गेली आहे. हे कृती दल बालकामगार काम करीत असलेल्या किती ठिकाणी धाड टाकतात, त्यांना रेस्क्यू करून त्यांचे पुनर्वसन करतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बालकामगार विरोधी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. पण बालकामगारांप्रति कृती दलाची भूमिका निष्क्रिय आहे.जिल्हा कृती दलाची जबाबदारी कामगार आयुक्त कार्यालयाला दिली आहे. महिला व बालविकास आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून त्यांना बालकामगार मुक्तीची चळवळ राबवायची आहे. कृती दलाला ६ ते १४ वयोगटातील कामगार बालकांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन आणि बालकांकडून काम करवून घेणाºया मालकावर, कंत्राटदारावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. तसेच बालकामगार कायदा २०१६ नुसार १४ ते १८ वयोगटातील धोकादायक ठिकाणी काम करमाºया मुलांची सुटका करून मुलांचे पुनर्वसन तसेच कामावर लावणाºया मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहे. परंतु त्यासाठी कृती दलाला धाडसत्र राबवायचे आहे. पण ही कारवाई होत नसल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने व्यवस्था निष्क्रिय असल्याचे चित्र सर्वत्र आहे.बालकांसाठी काम करणाºया ‘क्राय’ या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील २३ दशलक्ष बालकामगारांपैकी १९ दशलक्ष मुलांवर शिक्षण आणि नोकरी यांचा ताळमेळ न साधता आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. देशात लहान मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या. अपहरण झालेल्या मुलींपैकी ६० टक्के मुली १५ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत. नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी, एमआयडीसी, उमरेडच्या खाणीमध्ये वेकोलिमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड व गोंदिया जिल्ह्यातून बालकामगार कामासाठी आणले जातात. काही महिन्यांपूर्वी चाईल्ड लाईन, रेल्वे पोलीस व बालसंरक्षण कक्षाने बाहेरच्या राज्यातून कामासाठी आणलेल्या बालकांना रेस्क्यू केले होते. दोन वर्षांपूर्वी जिल्हा बालसंरक्षण विभागाने कॅण्डीको कंपनीतून मोठ्या प्रमाणात बालकांची सुटका केली होती. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन धाडसत्र राबविले जात नाही. सूत्रांच्या मते, या कारवाया शिथिल असल्याने मोठ्या प्रमाणात विविध व्यवसायात बालकामगारांचा वापर होत आहे.येथे आढळतात बालकामगारचहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल, कपडे, गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा/भंगार वेचणे, हॉटेल, बूटपॉलिश, गाड्या पुसणे, वरातीमध्ये लाईट डोक्यावर घेऊन जाणे आदी ठिकाणी बालकामगार आढळतात.

कायद्याचे उल्लंघन आहेबालकामगार निर्मूलनासाठी सरकारने कायदा केला आहे; पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बालकामगार वाढण्यात काही सामाजिक परिस्थितीही जबाबदार आहे. पण त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने नेमलेल्या प्रशासकीय यंत्रणेने कायद्याची अंमलबजावणी केल्यास बालकामगार मुक्तीची चळवळ यशस्वी होईल.- मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, एडुफास्ट वूमेन अ‍ॅण्ड चाईल्ड फाऊंडेशन

टॅग्स :Governmentसरकार