शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

मेळघाटात दररोज एक बालक मरणाच्या वाटेवर : बंडे साने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 23:42 IST

मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.

ठळक मुद्दे१९९३ पासून १४२५५ बालकांचा मृत्यू : व्यवस्थेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.मेळघाटमध्ये गेल्या २५ वर्षात कुपोषणामुळे झालेले बालमृत्यू, उपजतमृत्यू व मातामृत्यूची समस्या गंभीर आहे. याबाबत अनेक संघटनांनी, कार्यकर्त्यांनी निवेदन दिली, मोर्चे काढले, उपोषण केली परंतु, सरकारी अनास्थेमुळे अद्यापही प्रश्न कायम आहे. अनेक मंत्री, आमदार, खासदार, वैद्यकीय अधिकारी, मोठमोठी नेते, अशा सर्वांनी मेळघाटला भेटी दिल्या व परिस्थिती जाणली. तरीही ही समस्या सुटू नये हे कोडेच असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९९३ ते २०१८ या काळात मेळाघाटात १४,२५५ बालमृत्यू झाले. उपजतमृत्यूची संख्या ३८४३ आहे तर वैद्यकीय अहवालानुसार गेल्या १८ वर्षात २२६ मातांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. एकतर सरकारकडून जाणीपूर्वक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा योजना राबविणाऱ्या प्रशासनाकडून सरकारची धूळफेक केली जात असल्याचा आरोप साने यांनी केला. कुपोषणाचे भीषण वास्तव डोळ्यासमोर असताना आवश्यक त्या सोईसुविधा भागापर्यंत न पोहचणे ही शोकांतिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मेळघाटात सोनोग्राफीची सोय नाही, एकही रक्तपेढी नाही, हव्या तेवढ्या प्रमाणात बालरोग तज्ज्ञ, प्रसुती तज्ज्ञ उपलब्ध होत नाही, भूलतज्ज्ञांचीही सेवा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा येथील नागरिकांसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत समस्या सुटेल ती कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी मेळघाटाच्या समस्यांकडे लक्ष वेधावे आणि सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला अ‍ॅड. दशरथ बावनकर, ललिता बेठेकर, अनिल राजने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Melghatमेळघाटnagpurनागपूर