शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मेळघाटात दररोज एक बालक मरणाच्या वाटेवर : बंडे साने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 23:42 IST

मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.

ठळक मुद्दे१९९३ पासून १४२५५ बालकांचा मृत्यू : व्यवस्थेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अ‍ॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.मेळघाटमध्ये गेल्या २५ वर्षात कुपोषणामुळे झालेले बालमृत्यू, उपजतमृत्यू व मातामृत्यूची समस्या गंभीर आहे. याबाबत अनेक संघटनांनी, कार्यकर्त्यांनी निवेदन दिली, मोर्चे काढले, उपोषण केली परंतु, सरकारी अनास्थेमुळे अद्यापही प्रश्न कायम आहे. अनेक मंत्री, आमदार, खासदार, वैद्यकीय अधिकारी, मोठमोठी नेते, अशा सर्वांनी मेळघाटला भेटी दिल्या व परिस्थिती जाणली. तरीही ही समस्या सुटू नये हे कोडेच असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९९३ ते २०१८ या काळात मेळाघाटात १४,२५५ बालमृत्यू झाले. उपजतमृत्यूची संख्या ३८४३ आहे तर वैद्यकीय अहवालानुसार गेल्या १८ वर्षात २२६ मातांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. एकतर सरकारकडून जाणीपूर्वक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा योजना राबविणाऱ्या प्रशासनाकडून सरकारची धूळफेक केली जात असल्याचा आरोप साने यांनी केला. कुपोषणाचे भीषण वास्तव डोळ्यासमोर असताना आवश्यक त्या सोईसुविधा भागापर्यंत न पोहचणे ही शोकांतिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मेळघाटात सोनोग्राफीची सोय नाही, एकही रक्तपेढी नाही, हव्या तेवढ्या प्रमाणात बालरोग तज्ज्ञ, प्रसुती तज्ज्ञ उपलब्ध होत नाही, भूलतज्ज्ञांचीही सेवा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा येथील नागरिकांसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत समस्या सुटेल ती कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी मेळघाटाच्या समस्यांकडे लक्ष वेधावे आणि सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला अ‍ॅड. दशरथ बावनकर, ललिता बेठेकर, अनिल राजने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Melghatमेळघाटnagpurनागपूर