शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या मुख्यालयात दाखल, सरसंघचालकांशी करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 9:58 PM

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.

नागपूरः विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. अन्यथा आमच्याकडे पर्याय असल्याचा दावा करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजपा सत्तावाटपात झुकतं माप देत नसल्यानं शिवसेनाही आक्रमक झाली आहे.राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. 'देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच राज्यामध्ये येत्या काही काळात भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होईल,'' असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले असून, ते संघश्रेष्ठींशी या विषयावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे संघाच्या मध्यस्थीनं भाजपा-सेनेमधील सत्तावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे राज्यातील पेचप्रसंग सोडवण्याची विनंती केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सल्लागार असलेल्या किशोर तिवारी यांनी नितीन गडकरी यांना दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. तसेच तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019