शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अ‍ॅफकॉन्स, उपकंत्राटदाराविरुद्ध चिडाम कुटुंबाचीही तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:49 IST

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा; सेलू पोलीस स्टेशनकडे मागणी

मुरूमचोरीचा पर्दाफाश

नागपूर : कोटंबा येथील चिडाम कुटुंबानेही रविवारी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अधिकारी अनिल कुमार व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सचे मालक आशिष दप्तरी यांच्याविरुद्ध दीड एकर शेतातील मुरुम चोरून नेल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत शेताचे झालेले नुकसान एक कोटी गैरअर्जदारांनी भरून द्यावे व त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चिडाम कुटुंबाने केली आहे.

चिडाम कुटुंबाच्या मालकीचे सहा एकर शेत कोटंबा तहसील सेलू (जि. वर्धा) येथे आहे. त्याची सामायिक मालकी पार्वता शंकर चिडाम (६६), त्यांची दोन मुले सुभाष (४७) व सुनील (४२) आणि मुलगी रेखा चिडाम यांच्याकडे आहे. गेल्या आठवड्यात अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने यापैकी कुणाचीही परवानगी न घेता चिडाम यांच्या शेतात पोकलेन मशीन व बुलडोझर घालून दीड एकरातून मुरूम खोदून काढला व तो ट्रकद्वारे वाहून नेला.

‘लोकमत’ने ३० आॅगस्टच्या बातमीत या घटनेचा उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी (३१ आॅगस्टला) अ‍ॅफकॉन्सचे अधिकारी चिडाम यांच्या शेतात पोकलेन, बुलडोझर घेऊन पोहोचले व त्यांनी चिडाम यांच्या खड्डे पडलेल्या शेताची मुरूम भरून दुरुस्ती सुरू केली. खरे तर हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होता. पण त्यामुळे चिडाम यांच्या शेताचे अधिकच नुकसान झाले. लोकमतशी बोलताना सुनील चिडाम यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला व कुटुंबातर्फे पोलीस तक्रार सेलू पोलीस स्टेशनला रविवारी दाखल केल्याचे सांगितले. ‘शेत खोदण्यापूर्वी अ‍ॅफकॉन्स अथवा एम.पी. कन्स्ट्रक्शन्सने आमची कुणाचीही परवानगी घेतली नाही व मुरूम टाकण्यावेळीही परवानगी घेतली नाही. एका आदिवासी कुटुंबाला हा छळण्याचा प्रयत्न आहे, म्हणून पोलीस तक्रार केल्याचे सांगितले. अ‍ॅफकॉन्स आणि एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने एक कोटी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी सेलूचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर करीत आहेत. रविवारीही अ‍ॅफकॉन्सचे मुख्य अधिकारी बी. के. झा यांनी फोन उचलला नाही. या प्रकरणातून एक मोठा प्रश्न उभा झाला आहे, तो म्हणजे जर अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्स चिडाम यांचे शेत दुरुस्त करू शकते तर मग कोझी कन्स्ट्रक्शनची १०३ एकर जमीन का दुरुस्त करू शकत नाही.सरपंचांचा खोटेपणा उघडच्चोरीच्या मुरुमाची वाहतूक केल्यामुळे कोटंबा गावातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे गावात एसटी येत नाही. १ सप्टेंबरच्या वृत्तात कोटंब्याच्या सरपंच रेणुकाताई कोटंबकर यांनी एसटी सेवा बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सेलूला जाण्यासाठी आॅटोरिक्षांची व्यवस्था केल्याचे म्हटले होते.च्हे वृत्त वाचल्यानंतर कोटंब्याचे आॅटोरिक्षा चालक चंद्रभान वडगुजी भलावी (वाहन क्र. एम.एच.-३२-बी ७१४२) यांनी लोकमतला फोन करून माहिती दिली की, विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसमधूनच करावी लागते. आॅटोरिक्षातून करणे बेकायदेशीर आहे. कोटंब्यात एकूण सात आॅटोरिक्षा आहेत. त्यापैकी पाच सेलू ते वर्धा अशा चालतात व दोनच कोटंबा ते सेलू अशा चालतात.च्कोटंबा ग्रामपंचायतीने कोणतीही आॅटोरिक्षा भाड्याने घेतलेली नाही. बहुतेक विद्यार्थी शाळा बुडू नये म्हणून आॅटोरिक्षात बसतात व आम्हीही सेलूपर्यंत माणुसकी म्हणून त्यांची बेकायदा वाहतूक करतो. कधी कुणी ५-१० रुपये दिले तर घेतो; पण ग्रामपंचायत मात्र काहीच पैसे देत नाही, असे भलावी यांनी सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी