शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अ‍ॅफकॉन्स, उपकंत्राटदाराविरुद्ध चिडाम कुटुंबाचीही तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:49 IST

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा; सेलू पोलीस स्टेशनकडे मागणी

मुरूमचोरीचा पर्दाफाश

नागपूर : कोटंबा येथील चिडाम कुटुंबानेही रविवारी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अधिकारी अनिल कुमार व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सचे मालक आशिष दप्तरी यांच्याविरुद्ध दीड एकर शेतातील मुरुम चोरून नेल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत शेताचे झालेले नुकसान एक कोटी गैरअर्जदारांनी भरून द्यावे व त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चिडाम कुटुंबाने केली आहे.

चिडाम कुटुंबाच्या मालकीचे सहा एकर शेत कोटंबा तहसील सेलू (जि. वर्धा) येथे आहे. त्याची सामायिक मालकी पार्वता शंकर चिडाम (६६), त्यांची दोन मुले सुभाष (४७) व सुनील (४२) आणि मुलगी रेखा चिडाम यांच्याकडे आहे. गेल्या आठवड्यात अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने यापैकी कुणाचीही परवानगी न घेता चिडाम यांच्या शेतात पोकलेन मशीन व बुलडोझर घालून दीड एकरातून मुरूम खोदून काढला व तो ट्रकद्वारे वाहून नेला.

‘लोकमत’ने ३० आॅगस्टच्या बातमीत या घटनेचा उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी (३१ आॅगस्टला) अ‍ॅफकॉन्सचे अधिकारी चिडाम यांच्या शेतात पोकलेन, बुलडोझर घेऊन पोहोचले व त्यांनी चिडाम यांच्या खड्डे पडलेल्या शेताची मुरूम भरून दुरुस्ती सुरू केली. खरे तर हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होता. पण त्यामुळे चिडाम यांच्या शेताचे अधिकच नुकसान झाले. लोकमतशी बोलताना सुनील चिडाम यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला व कुटुंबातर्फे पोलीस तक्रार सेलू पोलीस स्टेशनला रविवारी दाखल केल्याचे सांगितले. ‘शेत खोदण्यापूर्वी अ‍ॅफकॉन्स अथवा एम.पी. कन्स्ट्रक्शन्सने आमची कुणाचीही परवानगी घेतली नाही व मुरूम टाकण्यावेळीही परवानगी घेतली नाही. एका आदिवासी कुटुंबाला हा छळण्याचा प्रयत्न आहे, म्हणून पोलीस तक्रार केल्याचे सांगितले. अ‍ॅफकॉन्स आणि एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने एक कोटी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी सेलूचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर करीत आहेत. रविवारीही अ‍ॅफकॉन्सचे मुख्य अधिकारी बी. के. झा यांनी फोन उचलला नाही. या प्रकरणातून एक मोठा प्रश्न उभा झाला आहे, तो म्हणजे जर अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्स चिडाम यांचे शेत दुरुस्त करू शकते तर मग कोझी कन्स्ट्रक्शनची १०३ एकर जमीन का दुरुस्त करू शकत नाही.सरपंचांचा खोटेपणा उघडच्चोरीच्या मुरुमाची वाहतूक केल्यामुळे कोटंबा गावातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे गावात एसटी येत नाही. १ सप्टेंबरच्या वृत्तात कोटंब्याच्या सरपंच रेणुकाताई कोटंबकर यांनी एसटी सेवा बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सेलूला जाण्यासाठी आॅटोरिक्षांची व्यवस्था केल्याचे म्हटले होते.च्हे वृत्त वाचल्यानंतर कोटंब्याचे आॅटोरिक्षा चालक चंद्रभान वडगुजी भलावी (वाहन क्र. एम.एच.-३२-बी ७१४२) यांनी लोकमतला फोन करून माहिती दिली की, विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसमधूनच करावी लागते. आॅटोरिक्षातून करणे बेकायदेशीर आहे. कोटंब्यात एकूण सात आॅटोरिक्षा आहेत. त्यापैकी पाच सेलू ते वर्धा अशा चालतात व दोनच कोटंबा ते सेलू अशा चालतात.च्कोटंबा ग्रामपंचायतीने कोणतीही आॅटोरिक्षा भाड्याने घेतलेली नाही. बहुतेक विद्यार्थी शाळा बुडू नये म्हणून आॅटोरिक्षात बसतात व आम्हीही सेलूपर्यंत माणुसकी म्हणून त्यांची बेकायदा वाहतूक करतो. कधी कुणी ५-१० रुपये दिले तर घेतो; पण ग्रामपंचायत मात्र काहीच पैसे देत नाही, असे भलावी यांनी सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी