शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

कोळशाच्या ओव्हरलोड ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 7:44 PM

सायकलने शाळेत जात असतानाच कोळशाने ओव्हरलोड असलेल्या ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले. हृदय हेलावून टाकणारा हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात झालेल्या या अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव प्रणव संजय ठुसे (१२, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे आहे. प्रणव उमरेडच्या संस्कार विद्यासागरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. एमएच-३४/एव्ही-२३५९ या क्रमांकाचा ट्रक गोकुल खदान येथून नागपूरच्या दिशेने जात होता. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त पसरताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या बायपास चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड) : सायकलने शाळेत जात असतानाच कोळशाने ओव्हरलोड असलेल्या ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले. हृदय हेलावून टाकणारा हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात झालेल्या या अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव प्रणव संजय ठुसे (१२, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे आहे. प्रणव उमरेडच्या संस्कार विद्यासागरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. एमएच-३४/एव्ही-२३५९ या क्रमांकाचा ट्रक गोकुल खदान येथून नागपूरच्या दिशेने जात होता. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचे वृत्त पसरताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.मूळ कुंभारी येथील रहिवासी असलेले ठुसे कुटुंबीय आंबेडकर कॉलनी, शिवनगर येथे वर्षभरापासून किरायाच्या खोलीत वास्तव्य करीत होते. नेहमीप्रमाणे प्रणव सायकलने शाळेत जाण्यासाठी निघाला. आंबेडकर कॉलनी येथून बायपास चौक ओलांडूनच शाळेच्या दिशेने पुढे जावे लागते. प्रणव आपल्या मित्रांसोबत सायकलने जात असताना अचानक ट्रकची धडक लागली. तो सायकलसह खाली कोसळला. चाकाखाली आला. यात प्रणव जागीच ठार झाला. प्रणवच्या हात आणि पायावरून ट्रकचे चाक गेले. खाली कोसळला. यामुळे त्याच्या डोक्यालाही जबर मार बसला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला लागलीच घटनास्थळावरून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तपासणीअंती प्रणवला मृत घोषित करण्यात आले. २७९, ३०४ अ, भादंवि सहकलम १८४, मोटर वाहन कायदा अन्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संग्रामसिंग चव्हाण करीत आहेत.मृत प्रणवचे वडील संजय ठुसे हे पवनी परिसरातील वलनी येथे विद्युत विभागात कर्तव्यावर आहेत. तत्पूर्वी ते पुणे येथे कार्यरत होते. मागील वर्षी वलनी येथे बदली झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय उमरेड येथे वास्तव्य करू लागले. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि लगतच असलेल्या कुंभारी येथील गावच्या शेतीकडेही लक्ष देता येईल, याउद्देशाने हे कुटुंबीय आंबेडकर ले-आऊट येथे किरायाच्या खोलीत राहत होते. अशातच या अपघातात प्रणवचा जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबीयांवर आभाळच कोसळले.‘ते’ थोडक्यात बचावलेप्रणवसोबत त्याचे अन्य चार मित्रदेखील सायकलने शाळेत जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भरधाव वेगाने ट्रक डाव्या बाजूने नागपूरच्या दिशेकडे वळत असतानाच प्रणवचे अन्य मित्र तातडीने पुढे निघाले. प्रणव मात्र ट्रकच्या चाकातच सापडला. अन्य मित्र भीतीने थबकले असते तर खूपच भयंकर चित्र समोर आले असते, असेही बोलल्या जात आहे. प्रणवच्या अपघातानंतर घटनास्थळी अनेकांनी आपला संताप व्यक्त केला.शाळेत गेला कशाला?प्रणव मरण पावल्याची बाब त्याच्या आईच्या कानावर पडताच त्या तातडीने ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्या. अगदी काही क्षणापूर्वी ‘आई मी जातो’ असे म्हणत जाणारा प्रणव रक्तबंबाळ अवस्थेत बेडवर मृतावस्थेत पाहून ती खालीच कोसळली. ‘तू शाळेत गेला कशाला’ असे म्हणत ती धाय मोकलून रडू लागली. तिच्या शेजारीच शाळेतील शिक्षिकांनी प्रणवच्या आईस सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षिकांसह सारेच गलबलून गेले.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी