शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

दीपालीच्या आईचा चरितार्थ शिवकुमारच्या उत्पन्नातून करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आराेपी अधिकारी शिवकुमारच्या वेतनातून आणि त्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आराेपी अधिकारी शिवकुमारच्या वेतनातून आणि त्याने जमवलेल्या संपत्तीतून दीपालीच्या आईचा चरितार्थ भागवावा, अशी मागणी ‘जस्टीस फाॅर दीपाली चव्हाण’ अभियानाच्या प्रमुख अरुणा सबाने यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दीपाली यांच्या आई आर्थिकदृष्ट्या दीपाली यांच्यावर अवलंबून हाेत्या. दीपाली यांच्या सुसाईड नाेटवरून ही बाब ठळकपणे लक्षात येते. २०१३च्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पीडिता किंवा तिच्या कुटुंबियांना आराेपीच्या उत्पन्नातून नुकसानभरपाई देण्याची तरतूद असल्याची बाब सबाने यांनी निवेदनात नमूद केली आहे. संबंंधित विभागाच्या मंत्र्यांनी तशाप्रकारचे आदेश काढावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर पावले उचलावी. यामुळे पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळेल आणि अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धडा शिकवता येईल. हा आदेश म्हणजे अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये माेठे उदाहरण ठरेल, असे मत सबाने यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, शिष्टमंडळाने वन विभागातर्फे तयार केलेल्या आत्महत्येच्या ९ सदस्यीय चाैकशी समितीवरही आक्षेप घेतला. या समितीतील बहुतांश वन अधिकारी हे श्रीनिवास रेड्डीच्या मर्जीतले आणि स्वयंसेवी संस्था लाभार्थी आहेत. ते दबावाखाली येऊ शकतात. त्यामुळे या घटनेचा तटस्थपणे विचार करणारे, न्याय देणारे निर्भीड सदस्य हवेत. या समितीने रेड्डी व शिवकुमारची चाैकशी साेडून दीपाली यांची चाैकशी चालवली आहे. या समितीतील बहुतांश सदस्य हे आयएफएसच्या मर्जीतील आहेत. पाच - पाच आयएफएस अधिकारी कशासाठी? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, सरकारी वकील, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असावा, अशी मागणी त्यांनी केली.

श्रीनिवास रेड्डी यांना अटक कधी?

दीपालीचा मानसिक आणि शारीरिक छळ जरी प्रत्यक्ष शिवकुमार यांनी केलेला असला, तरी तक्रार करूनही रेड्डींनी दीपालीची मदत केली नाही. उलट शिवकुमारला वारंवार पाठीशी घातले. त्यामुळे या आत्महत्येला शिवकुमार इतकेच निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. मात्र, आत्महत्येला २० दिवस उलटूनही रेड्डी यांना अद्याप अटक झालेली नाही. अचलपूर न्यायालयानेही रेड्डीचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही अद्याप रेड्डीला अटक का केली नाही, असा प्रश्नही सबाने यांनी उपस्थित केला. अनेक सबळ पुरावे रेड्डीच्या विरुद्ध असूनही रेड्डीला अमरावतीचे पोलीस अधीक्षक वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत की काय, अशी शंका येते. त्यामुळे ही चौकशी अमरावती पोलिसांकडून काढून घेण्यात यावी, अशीही मागणी केली.