शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बावनकुळे म्हणाले... एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 14:01 IST

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाला आंदोलनस्थळी भेट दिली. सरकारने योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांचे प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्या संपाला समर्थन देण्याकरता भाजप नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गणेशपेठ  बस स्थानकातील आंदोलनस्थळी भेट दिली. व सरकारने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी केली.

एसटी कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केले जात आहे. सरकारच्या चुकीच्या वागणुकीमुळेच काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून या सर्वाला हे सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुंबईतील आझाद मैदानावर रात्रभर थंडीत लोकं बसून आहेत. मात्र, मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असून कुणीही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेलं नाही. मात्र, आमचा या संपाला पाठिंबा असून त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागीही झालो आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, असे बावनकुळे म्हणाले.

यासोबतच, कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, आत्महत्या हा काही पर्याय नाही असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले. सरकारनेही आणखी लोकांच्या आत्महत्येची वाट पाहू नये, त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणू नये. काय समिती नेमायची ती नेमावी व त्यांचं समाधान होईल आणि हे आंदोलन मागे कसे घेता येईल, अशी कारवाई करावी अशी भावना बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी