शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

'सरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:07 IST

तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसानभरपाई केव्हा मिळेलसरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने  विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः  झोडपून काढले. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप  नेते चंद्रशेखर बावनुकळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.

तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तुर, हरभरा, भाजीपाला पाण्यात गेला, संत्री, मोसंबी, कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र, अद्याप सरकारकडून पंचनाम्याचे कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. तीन दिवस झाले, न पालकमंत्री न जिल्हाधिकारी कोणीच दौरे केलेले नाहीत. या सरकारला राजकारण करायला वेळ आहे मात्र, शेतकऱ्यांकरता नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

..आता बांधही गेला आणि पंचनामेही गेले 

मागच्या वेळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन नुकसानभरपाई देऊ असे म्हणाले होते. मात्र, आता बांधही गेला आणि पंचनामेही गेले. तुमच्यात थोडशीही संवेदनशीलताअसेल, तर तत्काळ सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा. व पंचनाम्याचे आदेश देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

विदर्भात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही, आणि माहिती मिळाली असेल तर त्यांना विदर्भाबाबत काळजी आहे की नाही, याचाही तपास करावा असा खोटक टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसUddhav Thackerayउद्धव ठाकरे