शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

'सरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:07 IST

तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसानभरपाई केव्हा मिळेलसरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने  विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः  झोडपून काढले. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप  नेते चंद्रशेखर बावनुकळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.

तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तुर, हरभरा, भाजीपाला पाण्यात गेला, संत्री, मोसंबी, कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र, अद्याप सरकारकडून पंचनाम्याचे कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. तीन दिवस झाले, न पालकमंत्री न जिल्हाधिकारी कोणीच दौरे केलेले नाहीत. या सरकारला राजकारण करायला वेळ आहे मात्र, शेतकऱ्यांकरता नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

..आता बांधही गेला आणि पंचनामेही गेले 

मागच्या वेळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन नुकसानभरपाई देऊ असे म्हणाले होते. मात्र, आता बांधही गेला आणि पंचनामेही गेले. तुमच्यात थोडशीही संवेदनशीलताअसेल, तर तत्काळ सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा. व पंचनाम्याचे आदेश देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

विदर्भात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही, आणि माहिती मिळाली असेल तर त्यांना विदर्भाबाबत काळजी आहे की नाही, याचाही तपास करावा असा खोटक टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसUddhav Thackerayउद्धव ठाकरे