शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपुरात ढगाळ वातावरणामुळे पुन्हा पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:52 IST

मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याचा इशारा : मध्य भारतामधील वातावरण बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील काळात आकाश ढगाच्छादित राहील. त्यामुळे एक किंवा दोन दिवसात पाऊस येऊ शकतो. अफगाणिस्तान व लगतच्या क्षेत्रातील हवामानातील बदलामुळे मध्य भारतामधील आकाशात ढग दाटले आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी क्षेत्रामध्ये चक्रियवात निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मध्य प्रदेश, विदर्भ व परिसरातील क्षेत्रावर पडू शकतो. विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.याचदरम्यान मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान २४ तासात ३.६ अंश सेल्सिअसवरून ११.५ अंशावर पोहचले. विदर्भात १०.५ अंश तापमानाची सर्वात कमी नोंद गोंदियात झाली. मागील २४ तासात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये २ ते ३ अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे.नागपुरातील कमाल तापमानसुद्धा ०.४ वरून २६.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. तरीही सामान्य तापमानापेक्षा २ अंशाने कमी असल्याने वातावरणात दिवसभर चांगलाच गारवा जाणवत होता. याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये १२ अंश, वाशिममध्ये १३ अंश किमान तापमान होते. बुलडाणा व यवतमाळात विदर्भात सर्वाधिक म्हणजे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस होते.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसnagpurनागपूर