शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

नागपूर जिल्ह्यात तलावांतील बदलामुळे होत आहे चेन रिऍक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 10:56 IST

Nagpur News जेव्हा मोठे तलाव लहान तलावांत परिवर्तित होतात, तेव्हा पाण्यातील जैवविविधतेतील संरचनेत परिवर्तन होत असते. अनेक जीव लुप्त होतात. यामुळे, जीवजंतूंची फूड चेन बाधित होते आणि याची चेन रिऍक्शन पर्यावरणावर दिसून येते.

ठळक मुद्देपर्यावरणाच्या आकलनासाठी सर्वेक्षण गरजेचे

श्रेयस होले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १९६४ मध्ये प्रकाशित नागपूर शताब्दी ग्रंथानुसार शहरात नऊ मोठे तलाव आहेत. यातील सहा मोठ्या तलावांचा कॅचमेंट एरिया नष्टप्राय झाल्याने ते लहान तलावांत परिवर्तित झाले आहेत. या दीर्घकालीन परिवर्तनाचा पर्यावरणावर खोलवर प्रभाव पडणार आहे. यासंदर्भात लोकमतने विशेषज्ञ म्हणून प्रख्यात वैज्ञानिकांशी संपर्क साधला असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपले मत व्यक्त केले. जेव्हा मोठे तलाव लहान तलावांत परिवर्तित होतात, तेव्हा पाण्यातील जैवविविधतेतील संरचनेत परिवर्तन होत असते. अनेक जीव लुप्त होतात. यामुळे, जीवजंतूंची फूड चेन बाधित होते आणि याची चेन रिऍक्शन पर्यावरणावर दिसून येते. त्यामुळे, ग्राउंड वॉटर रिचार्ज पॅटर्नही बदलायला लागते. गेल्या काही वर्षांत नागपूर जिल्ह्याचा भूजलस्तर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून येते. त्याचे कारणही हेच आहे. तरीदेखील तलावाच्या संवर्धनाबाबत ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाचे उदासीन धोरण आणि कमजोर नियोजन व विकासकार्यांमुळे ही चेन रिऍक्शन अत्यंत वेगाने होत आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करणे ठीक, परंतु कॅचमेण्ट एरियावरील अतिक्रमण दूर करण्यावर भर दिला, तर तलावातील पाणी वर्षभर टिकून राहील, यासाठी वैज्ञानिकांची एक समिती उभारून, पर्यावरणीय प्रभावावर सर्वेक्षण सरकारने करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कॅचमेण्ट एरियावर कचरा आणि घाण

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कॅचमेण्ट एरिया कमी होत आहे. फुटाळा तलावावरून हे स्पष्ट होते. लोकांकडून तेथे कचरा आणि घाण टाकली जात आहे. तेथे ना सुरक्षारक्षक आहे ना कोणता साइन बोर्ड. पावसात हाच कचरा आणि घाण तलावाच्या काठावर जमा होते. वाडी टोलबुथच्या मागे भिंत बनविण्याची मागणी पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे केली. परंतु, त्यांनीही दुर्लक्ष केले. राज्य सरकारही उदासीन आहे. तलावाच्या कॅचमेण्ट एरियाला संरक्षित वनक्षेत्र घोषित करण्याची गरज आहे.

- श्रीकांत देशपांडे, पर्यावरणप्रेमी

............

टॅग्स :Waterपाणीenvironmentपर्यावरण