शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

डाळींसह कडधान्य महागणार : पावसाअभावी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:55 PM

जून महिना आणि जुलैच्या दोन आठवड्यात पावसाने दगा दिल्यामुळे तूर आणि चण्यासह कडधान्याच्या पिकांना फटका बसणार आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षी तूर आणि चण्याचा साठा मोठ्या प्रमाणात केला होता. पण सरासरी पाऊस न आल्यास यावर्षी डाळींसह कडधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडे चणा आणि तुरीचा साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिना आणि जुलैच्या दोन आठवड्यात पावसाने दगा दिल्यामुळे तूर आणि चण्यासह कडधान्याच्या पिकांना फटका बसणार आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षी तूर आणि चण्याचा साठा मोठ्या प्रमाणात केला होता. पण सरासरी पाऊस न आल्यास यावर्षी डाळींसह कडधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारकडे मुबलक साठाइतवारी धान्य बाजार सीड्स अ‍ॅण्ड गे्रन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, पुढे पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुहेरी पेरणीचे संकट येणार आहे. गेल्यावर्षी देशात जुलैमध्ये ४५.७५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यावर्षी ३४.२५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पण पुढे पीक किती निघेल, हे पावसावर अवलंबून आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने डाळींच्या कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात साठा केला आहे. पीक कमी झाल्यास केंद्र उपलब्ध साठा बाजारात आणून किमती वाढू देणार नाही. त्यानंतरही भाव वाढल्यास सरकार निर्यातीवर निर्बंध आणून मुबलक साठा देशात उपलब्ध करून देईल.तीन वर्षांपूर्वी तूर डाळ २०० रुपये आणि चणा डाळ १५० रुपयांवर गेल्यानंतर केंद्र शासनाने तूर आणि चणा विदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने नाबार्डच्या माध्यमातून आयात आणि बाजारातून कच्चा माल खरेदी करून साठा केला. गेल्यावर्षी केंद्राकडे ३० लाख टन चणा आणि तुरीचा साठा होता. आता जवळपास १३ लाख टन शिल्लक असल्याचे मोटवानी म्हणाले.आयातीवर निर्बंध, तूर डाळीचे भाव वाढणार नाहीतदेशात व्यापाऱ्यांनी साठा करू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने चणा, तूर, मूग, उडद, मटर आदींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावले आहेत. पूर्वी तुरीसाठी २ लाख टन असलेले निर्बंध १ जुलैपासून ४ लाख टनावर नेले आहेत. त्यामुळे जास्त प्रमाणात तूर आयात होऊन डाळ मिलला मिळाल्यानंतर भाववाढीची शक्यता नाही. यावर्षी देशातील परवानाधारक व्यापाऱ्यांना एकत्रितरीत्या १.५० लाख टन मूग, १.५० लाख टन उडद, १.५ लाख टन मटर आयात करता येईल. १ जुलैपासून मूगाचा वायदा बाजारात समावेश केल्यामुळे सट्टा प्रवृत्ती वाढणार आहे. त्यामुळेच क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये भाव वाढले आहेत. पूर्वी व्यापारी आयात करून माल साठवून ठेवायचे, पण आता परवानाधारकाला परवानगी असल्यामुळे सट्टा प्रवृत्तीला आळा बसणार आहे.डाळींचे उत्पादन वाढलेतीन वर्षांपूर्वी तूर डाळ २०० रुपयांवर गेल्यानंतर शेतकºयांनी तूर आणि चण्याची जास्त प्रमाणात लागवड केली. त्यामुळे तूर आणि चणा डाळीचे भाव अर्ध्यापेक्षा कमी झाले. तीन वर्षांपूर्वी देशात २.४० लाख टन डाळींची खपत होती. त्या तुलनेत उत्पादन जवळपास १.८० लाख टन होते. उर्वरित ५० ते ६० लाख टन आयात करावी लागत होती. पण दोन वर्षांपूर्वी उत्पादन विक्रीच्या तुलनेत जास्त झाले आहे. त्यामुळे आता डाळींसाठी कच्चा माल आयात करावा लागत नाही.मोठ्या कंपन्यांमुळे व्यावसायिकांना फटकाटाटा, महिन्द्र, पतंजली आदींसह अन्य कंपन्या डाळी आणि कडधान्य पॅकिंग करून मॉलमध्ये विकत आहे. त्याचा लहान व्यावसायिकांना फटका बसला आहे. यामुळे लहान व्यावसायिकांचा जवळपास ३० ते ४० टक्के व्यवसाय हिरावला आहे.

 

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई