शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाया गेल्यास सीईओ जबाबदार : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपुऱ्या पावसामुळे पेंच प्रकल्पासह जिल्ह्यातील सर्व जलाशयात अपुरा पाण्याचा साठा निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची ...

ठळक मुद्देउपलब्ध जलसाठ्यानुसार प्रकल्पनिहाय आरक्षणपेंच प्रकल्पात २२.४८ टक्के तर निम्न वेणात ८८.२३ टक्के साठानागपूरसह सर्व नगरपालिकेसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण१५ टक्क्यापेक्षा जास्त अपव्ययासाठी जबाबदारी निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपुऱ्या पावसामुळे पेंच प्रकल्पासह जिल्ह्यातील सर्व जलाशयात अपुरा पाण्याचा साठा निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करतानाच १५ टक्केपेक्षा जास्त पिण्याचे पाणी वाया जात असेल अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील जलसाठ्यातील पिण्याच्या पाण्याच्या वापराबाबत महसूल उपविभागीय अधिकाऱ्याने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, आ. सुधाकर देशमुख,आ. जोगेंद्र कवाडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, माजी आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता एस. जी. ढवळे, जितेंद्र तुरखेडे तसेच सर्व नगर परिषद, नगर पंचायतचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.मोवाड, कुही, कामठी, नरखेड, सावनेर, मौदा आदी शहरासाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करुन नदीतील पाण्याच्या आरक्षणासंदर्भातही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. कुही नगर परिषदेसाठी कन्हान नदीवरील चिकना या गावाजवळ पाणी पुरविणे, कामठीसाठी पाण्याचे आरक्षण वाढवून देणे, नरखेड व मोवाडसाठी पिंपळगाव येथील लघु प्रकल्पातून पाणी उपलब्ध करुन देणे, काटोल शहरासाठी सिंचन प्रकल्पात पाण्याचे आरक्षण करणे. मौदा नगर परिषदेसाठी कन्हान नदीवरुन पाणी उपलब्ध करुन देणे आदी प्रस्तावावरही यावेळी चर्चा करण्यात आली व त्यानुसार पाण्याच्या आरक्षणासाठी प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पामध्ये तोतलाडोह-पेंच, खिंडसी या प्रकल्पामध्ये २२.४८ टक्के, निम्न वेणा अंतर्गत वडगाव-नांद प्रकल्प ३१ टक्के जलसाठा उपलब्ध असून नागपूर पाटबंधारे विभागाकडील चंद्रभागा, मोरधाम, उमरी कोलार, खेखरानाला व जाम या सात प्रकल्पात ३९.४० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करुन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करताना उपलब्ध पाण्याचे त्यानुसार आरक्षण निश्चित करावे, असेही यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध जलसाठ्याच्या नियोजनासंदर्भात आमदार सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी आमदार आशिष देशमुख, महापौर नंदा जिचकार आदींनी विविध सूचना केल्या. प्रारंभी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक जयंत गवळी व कार्यकारी अभियंता एस. जी. ढवळे यांनी जलसंपदा विभागातर्फे सन २०१८-१९ साठी पाणी आरक्षणाबाबतची माहिती बैठकीत दिली.उन्हाळ्यातील पाणी आवश्यकतेची माहिती आठ दिवसात सादर कराजिल्ह्यातील सर्व नगर परिषदांनी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसंदर्भातील मागणी लक्षात घेऊन पाण्याच्या आरक्षणासंदर्भातील माहिती येत्या आठ दिवसात सादर करण्याची सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे