शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हे झाडांना जगविण्याचे, की हळूहळू मारण्याचे प्लॅनिंग? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:11 IST

नियमानुसार झाडाला पाणी शोषून घेता येईल एवढी जागा साेडणे गरजेचे आहे. त्यासाठी एक ते दीड मीटर जागा साेडावी आणि बुंध्याभाेवती कठडे बनविणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून नियमांची ऐसीतैशी केली जात असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले.

ठळक मुद्देविमानतळ राेडवरील १५-२० झाडांवर संकटबुंध्याजवळ सिमेंट काॅंंक्रीटचा मलबा

नागपूर : भविष्यात पर्यावरण जगण्यायाेग्य राहण्यासाठी वृक्षसंवर्धनाची किती गरज आहे, हे वारंवार सांगण्याची तशी गरज नाही. मात्र जबाबदार यंत्रणाच बेजबाबदारपणे वागून झाडांच्या जिवावर उठल्याचे दिसून येते. वर्धा राेडकडून विमानतळाकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर असाच प्रकार दिसून येताे. येथे रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र बांधकाम करताना कडेला असलेल्या झाडांना जगविण्याऐवजी हळूहळू मारण्याचेच नियाेजन केले जात आहे का, असे चित्र दिसून येत आहे.

या परिसरात नेहमी सायकलिंग करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्ता समीर कुळकर्णी यांनी अनेक दिवस निरीक्षण करून ही बाब ‘लाेकमत’च्या समाेर आणून दिली आहे. त्यांच्या मते या डांबरी रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची तशी काहीच गरज नव्हती. मात्र सिमेंट रस्ता बांधण्यात येत आहे. रस्ता बनविताना कडेला असलेल्या जुन्या झाडांचे संवर्धन हाेईल, असे नियाेजन करणे गरजेचे आहे.

नियमानुसार झाडाला पाणी शोषून घेता येईल एवढी जागा साेडणे गरजेचे आहे. त्यासाठी एक ते दीड मीटर जागा साेडावी आणि बुंध्याभाेवती कठडे बनविणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून नियमांची ऐसीतैशी केली जात असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले.

एकतर कंत्राटदाराने झाडाजवळून अर्धा फूट जागाही न साेडता सिमेंट रस्त्याचे काम चालविले आहे. विमानतळाच्या सुरक्षा भिंतीकडून जागा साेडली असली तरी फूटपाथ बनविल्यानंतर तिही सुटणार नाही. दुसरे म्हणजे झाडांची मुळे एकाच दिशेने पसरत नाही हेही महत्त्वाचे. त्यामुळे पुढे पाणी शोषून घेण्याची जागाच उरणार नाही तर ते झाड जगेल कसे. 

याशिवाय पुढच्या काळात रस्ता रुंद झाल्याने वाहतुकीला अडथळा हाेते म्हणून त्या झाडांना कापण्यासही यंत्रणा मागेपुढे पाहणार नाही. आणखी धक्कादायक म्हणजे झाडाच्या बुंध्याभाेवती माती टाकण्याऐवजी कंत्राटदाराने काॅंंक्रीटचा मलबा टाकला आहे. अशा प्रकारामुळे जमिनीतून जीवनसत्वे शाेषणासाठी या झाडांना माेकळीक मिळणार नाही आणि हळूहळू ती झाडे मरणासन्न हाेतील, अशी भीती कुळकर्णी यांनी व्यक्त केली. या रस्त्यावरील ५० ते १०० वर्ष वयाची १५ ते २० झाडांना रस्ते बांधकामाच्या चुकीच्या नियाेजनाचा फटका बसणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :environmentपर्यावरण