शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जातगणना होणारच, आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंतही तोडणार

By कमलेश वानखेडे | Updated: November 6, 2024 17:31 IST

Nagpur : राहुल गांधी यांचा नागपुरातील संविधान संमेलनात निर्धार

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले हक्क व अधिकारांपासून वंचित राहिलेल्या ९० टक्के भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जातगणना आवश्यक आहे. ही मागणी जोर धरू लागल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडाली आहे. जातगणना झाली तर देशाचे संविधान वाचेल. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काहीही चर्चा केली तरी जातगणना होणारच व आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंतही तोडली जाईल, असा निर्धार काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे बुधवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी झाले. तत्पूर्वी त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, संमेलनाचे आयोजक उमेश कोर्राम, अनिल जयहिंद आदी उपस्थित होते. रेशीमबागेतील संघ मुख्यालयाच्या बाजूलाच होत असलेल्या संविधान संमेलनात राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवत हे एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र असल्याचे सांगितले. यात जे काही लिहिले आहे तेच सर्व महापुरुषांना अपेक्षित होते. यात हजारो वर्ष जुना समानतेचा विचार मांडण्यात आला आहे. कोणतीही एक व्यक्ती देशातील सर्व धन, शक्ती, भविष्य हिसकावून घेऊ शकत नाही. समानता, प्रत्येक जात धर्माविषयी आदर करावा हे यात लिहिले आहे. त्यामुळे भाजप, आरएसएस जेव्हा संविधानावर आक्रमण करते तेव्हा देशाच्या आवाजावर अतिक्रमण करतात. संविधानानुसार घटनात्मक संस्था चालतात. राजा महाराजांच्या काळात निवडणूक आयोग नव्हता. संविधान नसेल तर सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक हॉस्पिटल हे सर्व गायब होतील, असा धोका त्यांनी वर्तविला.

या देशातील ९० टक्के लोकांच्या हाती अद्याप पॉवर नाही. कॉर्पोरेट, मिडिया, न्यायव्यवस्थेत या ९० टक्के लोकांची भागिदारी नाही. हे लोक तुरुंगात, मनरेगाच्या तसेच विविध बांधकामांवर काम करताना दिसतात. मग कुणाचा विकास व प्रगती झाली. खासगी कंपन्यांच्या व्यवस्थापनात दलित, मुस्लिम, आदिवासी, अल्पसंख्याक दिसत नाहीत. ५ टक्के लोक देश चालवत आहेत. जातगणना झाली तर दलित, मुस्लिम, आदिवासी, अल्पसंख्याक या सर्व घटकांना कळेल की त्यांच्या हाती किती पॉवर व संपत्ती आहे. यामुळे एक स्पष्टता येईल. जातगणना ही विकासाची एक पद्धत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

आरएसएस संविधानावर मागून वार करतेआरएसएस संविधानावर कधीच थेट आक्रमण करीत नाही. ते घाबरतात, त्यामुळे समोरून येऊ शकत नाही. म्हणून ते विकास, प्रगती, इकॉनॉमी अशा शब्दांमागे लपून येतात. शिशु मंदिर, एकलव्य शाळांच्या मागे लपून येतात. येथे लागणारा पैसा हा मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातच्या सरकारचा व राष्ट्रीय महामार्गांचा आहे. अंबानी, अदानीचा पैसा आहे. त्यांचे लक्ष्य मागून सुरा खूपसणे हेच असते. त्यांच्यात दम असता तर ते समोरून आले असते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूरcongressकाँग्रेस