शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केबल ऑपरेटरकडे ३१ मार्चपर्यंत नोंदणीची मुभा : ट्रायचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:43 IST

लोकमत  न्यूज नेटवर्क  नागपूर : देशातील सर्व चॅनल्स १५ फेब्रुवारीपासून बंद होणार होते. पण आता ट्रायच्या मंगळवारच्या आदेशानुसार चॅनल ...

ठळक मुद्देग्राहकांना सेवा पूर्ववत मिळणार

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील सर्व चॅनल्स १५ फेब्रुवारीपासून बंद होणार होते. पण आता ट्रायच्या मंगळवारच्या आदेशानुसार चॅनल ३१ मार्चपर्यंत निरंतर सुरू राहणार आहे. ज्यांनी चॅनल निवडले आहेत, त्यांना पैसे परत मिळणार नाहीत. पण ज्यांचे महिनेवारी शुल्कानुसार चॅनल सुरू आहेत, त्यांची त्याच शुल्कात पेड चॅनलची सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशन विदर्भाचे अध्यक्ष सुभाष बांते यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.३१ मार्चपर्यंत ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच महिनेवारीनुसार शुल्क द्यायचे आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास ग्राहक जर महिन्याला ३०० रुपये केबल शुल्क देत असेल त्याला तेवढ्याच किमतीचे पेड चॅनल पाहता येतील. ट्रायच्या नवीन आदेशामुळे पॅकेज निवडलेल्या ग्राहकांच्या प्रांतीय भाषांकडे लक्ष देणे कठीण होणार आहे. बांते म्हणाले, पॅकेजची निवड केलेल्यांची त्याच किमतीत केबल सेवा सुरू राहील. खरं पाहता १ जानेवारीपासून पॅकेज सिस्टीममुळे वसुलीवर बे्रक लागला आहे. ग्राहक नोंदणीसाठी एकाच वेळी येत असल्यामुळे यंत्रणेअभावी त्यांचे पॅकेज लॉगईन करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम पसरला आहे. पण ग्राहकांना निरंतर सेवा देण्यासाठी केबल आॅपरेटर्स दिवसरात्र काम करीत आहेत.प्रारंभी १०० फ्री टू एअर चॅनलसाठी १३० रुपये आणि त्यावर १८ जीएसटी असे एकूण १५४ रुपये ग्राहकांना द्यायचे आहेत. त्यात २५ चॅनल दूरदर्शनचे असून उर्वरित भाषिक चॅनल्स आहेत. त्यानंतर ग्राहकांना एमएसओचे पॅकेज निवडायचे आहेत. ट्रायच्या आदेशानुसार ग्राहकांना १८ टक्के जीएसटीसह २५ पेड चॅनलसाठी २० रुपये नेटवर्क कॅपॅसिटी फी वेगळी लागणार आहे.बांते म्हणाले, सर्व चॅनलवर जीएसटीच्या आकारणीपूर्वी केबल इंडस्ट्री असंघटित होती, पण आता सर्व चॅनलवर जीएसटीच्या आकारणीमुळे ही इंडस्ट्री संघटित झाली आहे. प्रत्येक चॅनलवर जीएसटी आकारण्यात येत आहे. पूर्वीपेक्षा मार्जिन कमी झाली आहे. काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. केबल ऑपरेटर्सतर्फे कर्मचाऱ्यांना संबंधित सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ट्रायने तक्रारीसाठी कॉल सेंटर बनविले आहे. ब्रॉडकास्टर्सच्या जाहिरातींचा ओघ कमी झाल्यास पुढे पेड चॅनलचे दर कमी होतील. बांते म्हणाले, आमचे कमिशन अजूनही ठरले नाही. ते वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.पत्रपरिषदेत फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रभात अग्रवाल, संजय लाकूडकर आणि अनेक केबल ऑपरेटर्स उपस्थित होते.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनnagpurनागपूर