शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:20 AM

हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील.

ठळक मुद्देबंदद्वार बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना केले आश्वस्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील. इतरांचा विचार होणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा दिला.शरद पवार मंगळवारी दुपारी नागपुरात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी प्रेस क्लबमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बंदद्वार बैठक घेतली. बैठकीला मंत्री व आमदारांशिवाय मोजक्याच पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. बैठकीत पवार यांनी आमदारांची वेगवेगळ्या विषयावरील मते ऐकून घेतली. मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली. यावर शरद पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासाठी काँग्रेसकडून त्यांची नावे निश्चित करण्यासाठी वेळ लागू शकतो. कारण त्यांच्याकडे हायकमांड पद्धत आहे. दिल्लीतून नावे निश्चित होतात. काँग्रेसमध्ये एक गट ज्येष्ठांना आता बाजूला सारून तरुणांना संधी देण्याची मागणी करीत आहे तर ज्येष्ठ म्हणत आहेत की ही आमची शेवटची संधी असल्याचे सांगत आपला दावा सादर करीत आहेत. त्यामुळे त्यांना वेळ लागू शकतो. राष्ट्रवादी व शिवसेनेचे निर्णय स्थानिक पातळीवर होतात. काँग्रेसला वेळ लागला तरी अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे त्यांनी आश्वस्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीवरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.पवारांचा सल्ला, लोकांच्या संपर्कात रहाबैठकीत शरद पवारांनी आमदारांचे प्रश्न ऐकून घेत त्यांना लोकांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला. मतदारसंघात फिरा. जास्तीत जास्त नागरिकांना भेटा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशी सूचनाही त्यांनी आमदारांना केली.कर्जमाफी दोन टप्प्यातकर्जमाफी देणार यावर सरकार ठाम आहे. त्यासाठी तयारी झाली आहे. प्रसंगी कर्ज घेण्याचीही तयारी आहे. विरोधकांच्या दबावाला सरकार बळी पडणार नाही. अभ्यास सुरू आहे. बँकांकडे माहिती मागविण्यात आली आहे. हे आर्थिक वर्ष संपताना व नवे आर्थिक वर्ष सुरू होताना दोन टप्प्यात कजंमाफीकरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीची तरतूद केली जाईल, अशी माहितीही बैठकीत आमदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.रेल्वे स्टेशनला गोडसेचे नाव देण्यास विरोधउत्तर प्रदेशच्या एका रेल्वे स्टेशनला नाथूराम गोडसेचे नाव देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला पुढाकार निंदनीय आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याचे नाव जर एखाद्या स्टेशनला दिले जात असेल तर जनता देशातून भाजपचे नाव मिटविल्याशिवाय राहणार नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार