शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पॅकबंद असलेलेच उपवासाचे अन्न पदार्थ विकत घ्या

By सुमेध वाघमार | Updated: July 15, 2024 19:04 IST

अन्न प्रशासानाचे आवाहन : मार्च महिन्यात १००वर जणांना झाली होती विषबाधा

सुमेध वाघमारे नागपूर : बुधवारी आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक उपवास करतात. उपवासाच्या विविध पदार्थांची चव या दिवशी चाखली जाते. परंतु मार्च महिन्यात उपवासाच्या अन्नपदार्थांमधून नागपुरात जवळपास १००वर जणांना झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संभव्य अपाय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठ विकत घेताना किंवा उपवासाचे तयार पदार्थ विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्या, असे आवाहन केले आहे.      

महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्य शिंगाड्याचे पीठ व उपवास भाजणी पीठापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थ खाल्ल्याने मेयो, मेडिकलसह इतरही शासकीय व खासगी रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढली होती. याची खबरदारी घेत ‘एफडीए’ने सोमवारी प्रसिद्ध पत्रक काढून नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, भगरीवर मोठया प्रमाणात ‘अस्परजिलस’ या प्रजातीच्या बुरशीचा प्रभाव असतो. ज्यामुळे ‘फ्युमिगाक्लेविन’ या सारख्या विषद्रव्य तयार होतात. जुलै महिन्यातील तापमान व आद्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकुल असते. अशी बुरशीचा प्रादूर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होवू शकते. त्याअनुषंगे नागरीकानी व अन्न व्यवसायिक व हॉटेल चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संभव्य अपाय टाळण्यासाठी हे करा

  • भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठा व खादयतेल आदी विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्या.
  • या अन्नपदार्थावर ‘ब्रॅन्ड’ नसल्यास दुकानदाराला याबाबत विचारणा करा.
  • अन्नपदार्थांच्या पॅकेटवर उत्पादन केव्हा झाले याचा तपशील पाहुन घ्या. 
  • खुल्या भगरीचे पीठ बाजारतून विकत घेवू नका
  • भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करा.
  • भगर साठवितांना ती स्वच्छ कोरडया ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्ब्यात ठेवा,  
  • जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठविलेली भगर खाऊ नका. 
  • उपवासाचे अन्न पदार्थ व घटक पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्यांकडुन बिल घ्या.
  • भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठापासून तयार उपवासाचे अन्न पदार्थ लगेच सेवन करा, शिळे अन्न टाळा.
  • भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. या पदार्थांचे सलग दोन-तीन दिवस सेवनाने अ‍ॅसिडीटीचा त्रास होवू शकतो. 

 

दुकानदारांनी घ्यावयाची काळजी

  • विनाबिलाने कोणतेही अन्नपदार्थ खरेदी व विक्री करु नये.
  • चांगल्या प्रतीची भगर व पॅकबंदच अन्नपदार्थांची विक्री करावी. 
  • मुदतबाहय झालेले अन्नपदार्थांची विक्री करु नये.
  • भगरीचे पीठ स्वत तयार करुन विक्री करु नये. 

 

येथे तक्रार नोंदवाअन्नखाद्यपदार्थ खरेदी करताना काही आक्षेपार्ह आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन, नागपूर कार्यालयाच्या दुरध्वीनी क्रमांक ०७१२-२५६२२०४ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही सह आयुक्त (अन्न) कै . रं. जयपूरकर यांनी केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर