शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रात सर्वाधिक दराने वीज खरेदी; सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका

By कमलाकर कांबळे | Updated: March 5, 2023 08:00 IST

Nagpur News महाराष्ट्रात वीज कंपन्यांकडून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक दरात वीज खरेदी करण्यात आली. म्हणजेच महाराष्ट्र वीज खरेदीचे दर नियंत्रित करू शकले नाही. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणने २६,४८३ कोटी अतिरिक्त खर्च केले

कमल शर्मा

नागपूर : आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महावितरणने वीज खरेदीवर २६,४८३ कोटी रूपये अतिरिक्त खर्च केले. महाराष्ट्रात वीज कंपन्यांकडून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक दरात वीज खरेदी करण्यात आली. म्हणजेच महाराष्ट्र वीज खरेदीचे दर नियंत्रित करू शकले नाही. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

राज्यातील नागरिकांना वीज दरवाढीचा मोठा शॉक देण्याची पूर्ण तयारी महावितरणने केली आहे. परंतु आपल्या गुणवत्तेची कमतरता लपविण्यासाठी महावितरण शेतकऱ्यांसह ग्राहकांना दोषी ठरवत आहे. वीज बिल भरले जात नाही. थकबाकी वाढल्याने कंपनीची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळेच दरवाढ आवश्यक आहे, असा महावितरणचा दावा आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, महावितरण २०१९ पासून आतापर्यंत वीज खरेदीला नियंत्रणात ठेवू शकले नाही. कंपनीने यावर २६,४८३ कोटी रूपये अतिरिक्त खर्च केले. यात २०२०-२१ या वर्षाचाही समावेश आहे. जेव्हा कोरोनामुळे विजेची मागणी कमी झाली होती, त्या कालावधीतच स्वीकृत रकमेतून १५५८ कोटी रूपये कमी खर्च झाले.

दुसरीकडे देशातील इतर राज्यांनी वीज खरेदीवर यापेक्षा कमी खर्च केला. राजस्थानने ४.८७ रूपये, गुजरातने ४.५१ रूपये आणि मध्य प्रदेशने ४.३१ रूपये प्रति युनिटच्या दराने वीज खरेदी केली. महाराष्ट्रात महावितरणने मात्र ४.९० रूपये प्रति युनिट दराने वीज खरेदी केली. सूत्रांचे म्हणणे आहे की, महावितरणने बाजारात स्वस्त वीज उपलब्ध असूनही सरकारी कंपनी महाजेनकोकडून महागडी वीज खरेदी केली. महावितरण हा खर्च वसूल करण्यासाठी दर महिन्याला नागरिकांकडून भरभक्कम इंधन समायोजन शुल्क वसूल करीत आहे. आता तर दरवाढ करण्यावरच अडून आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, २०२३-२४ साठी १४ टक्के आणि २०२४-२५ साठी ११ टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार ४४ टक्के दरवाढ केली जाईल.

राज्यांतील वीज खरेदी

राज्य खरेदी प्रति युनिट पारेषणसह एकूण दर

महाराष्ट्र - ५८,६७६ कोटी - ४.९० रूपये - ५.७० रूपये

राजस्थान - ३६,७८५ कोटी - ४.८७ रूपये - ५.५२ रूपये

गुजरात ४१,४०२ कोटी - ४.५१ रूपये - ५.३५ रूपये

मध्य प्रदेश २९,८८२ कोटी - ४.३१ रूपये - ५.३४ रूपये

 

कोळसा आयात हे मोठे कारण - महावितरण

महावितरणने अधिक खर्चासाठी कोळशाची आयात हे एक मोठे कारण असल्याचे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोळशाच्या आयातीमुळेच वीज उत्पादन खर्च वाढला. तसेच केंद्रीय नियामक आयोगाचे निर्देश व कोळसा ब्लॉकबाबत नियमांमध्ये झालेल्या बदलामुळेही खरेदीचे दर वाढले. जेव्हा देशातील इतर राज्य लोडशेडिंगचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात अबाधित वीजपुरवठा होत असल्याचा दावाही महावितरणने केला आहे.

टॅग्स :electricityवीज