शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

बिहारच्या बुद्धगया मुक्तीसाठी बौद्धांनी कसली कंबर; महाविहाराचा ताबा देण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ ला करणार संसदेचा घेराव

By आनंद डेकाटे | Updated: September 27, 2025 19:32 IST

Nagpur : बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांनी कंबर कसली आहे. विविध माध्यमांतून यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत असून बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याची एकमुखी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांनी कंबर कसली आहे. विविध माध्यमांतून यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत असून बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याची एकमुखी मागणी होत आहे. याअंतर्गत आता १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भन्ते विनयाचार्य यांच्या नेतृत्वात बुद्धिस्ट समन्वय संघाने संसद घेरावाची घोषणा केली आहे, अशी माहिती बुद्धिस्ट समन्वय संघ समितीचे निमंत्रक नितीन गजभिये यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

भन्ते विनयाचार्य यांचा जनसंवाद कार्यक्रम धम्मध्वज यात्रा १६ ऑगस्ट २०२५ रोजी पवित्र दीक्षाभूमी येथून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात २ सप्टेंबर, २०२५ रोजी मुंबईतील चैत्यभूमी व दुसऱ्या टप्प्यात पुण्यातून सुरू झालेली धम्मयात्रेचा समारोप २४ सप्टेंबर, २०२५ रोजी सौंसर येथे झाला. या यात्रेच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत मुक्ती आंदोलन गेले. समाजात शांती, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढवणे हे, बौद्ध धर्माचे मुख्य तत्त्व आहे. ते या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पत्रपरिषदेत राकेश धारगावे, रत्नदीप रंगारी, योगेश राऊत, स्मिता वाकडे, दिनेश शेंडे, मोंटी खुटे, विलास मेश्राम, मुकेश मेश्राम आदी उपस्थित होते.

भन्ते विनयाचार्य, आकाश लामा यांना दीक्षाभूमीवर आमंत्रित करावे

देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू अहे. भन्ते विनयाचार्य, आकाश लामा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. महाबोधी मुक्ती आंदोलन व बीटी ॲक्ट १९४९ काय आहे, याची माहिती देशाला व्हावी यासाठी दीक्षाभूमी येथील मुख्य कार्यक्रमात दोघांनाही मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करावे अशी मागणी यावेळी राकेश धारगावे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Buddhists rally for Bodh Gaya liberation; Parliament siege planned.

Web Summary : Buddhists are intensifying their movement to liberate Bodh Gaya's Mahabodhi Temple. They demand the repeal of the BT Act 1949 and plan to siege Parliament on February 12, 2026, under Bhante Vinayacharya's leadership, to advocate for Buddhist control of the Mahavihara.
टॅग्स :nagpurनागपूरBiharबिहारDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी