शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

ब्रुसेल्ला जिवाणूची पशुवैद्यकांत दहशत

By admin | Updated: May 24, 2014 01:06 IST

गाय-म्हैस या पाळीव पशूंमध्ये बु्रसेल्ला हा घातक जिवाणू आढळल्याने भीती निर्माण झाली आहे. या जिवाणूचा संसर्ग मानवाला झाल्याचे प्रकार पुढे येत आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय

पशूपासून मानवाला संसर्ग : संपूर्ण राज्यात राबविणार लसीकरण मोहीम

सुरेंद्र राऊत - यवतमाळ

गाय-म्हैस या पाळीव पशूंमध्ये बु्रसेल्ला हा घातक जिवाणू आढळल्याने भीती निर्माण झाली आहे. या जिवाणूचा संसर्ग मानवाला झाल्याचे प्रकार पुढे येत आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये याचा संसर्ग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात केवळ दोन टक्के प्रमाण असले तरी संभाव्य धोका ओळखून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत बर्ड फ्लू हाच एक कोंबडीपासून पसरणारा आजार माहीत होता. मात्र आता पाळीव जनावरांपासूनसुध्दा माणसाला संसर्ग होत असल्याचे दिसून येते. रॅबीजपेक्षाही भयंकर समजल्या जाणार्‍या ब्रुसेल्ला या जिवाणूची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. या जिवाणूचा वाहक असलेल्या गाय, म्हैस यांच्या प्रसूतीनंतर बाहेर पडणारा गाभ व जाळातून याचा संसर्ग होतो. ग्रामीण भागात गाईची प्रसूती करताना उघड्या हातानेच हा जाळ काढण्यात येतो. हाताला जखम असल्यास आणि चुकून न यातील काही द्रव्य डोळ्यात, नाकात उडाल्यास संसर्ग होण्याची भीती राहते. या जिवाणूचा संसर्ग एका वाहक पशूकडून दुसर्‍या पशूला होऊ शकतो. स्त्रियाही या जिवाणूच्या वाहक असू शकतात. संसर्ग झाल्यानंतर वारंवार ताप येतो. हा जिवाणू मज्जातंतूत शिरल्यास अर्धांगवायूचा झटका येण्याची भीती असते. गडचिरोली जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या रक्त नमुन्यांची तपासणी केली असता २५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. यवतमाळ जिल्ह्यात दोन टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. उमरखेड येथील पशुसंवर्धन अधिकार्‍यास अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने योग्य दक्षता घ्यावी असे, निर्देश देण्यात आले आहेत. गाय किंवा म्हशीची प्रसूती झाल्यानंतर पशुपालक निघणारा गाभ, जाळ चुकीच्या पध्दतीने हाताळतात, बरेचदा तो गोठ्यातच पसरून राहतो. त्याला खोल खड्डा करून जमिनीत पुरणे आवश्यक आहे. जे जनावर ब्रुसेल्ला जिवाणूचे वाहक आहे त्याचा वारंवार गर्भपात होतो. यावर कोणातच ठोस उपचार नाही. त्यामुळे जिवाणूचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी चार ते १२ महिन्याच्या कालवडी आणि वगारींना याची प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. संपूर्ण देशातच हा कार्यक्रम राबविला जात आहे. या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण गुजरात, राजस्थान या राज्यात अधिक आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी गावठी पध्दतीने गाय, म्हैस फळविण्याऐवजी शेतकर्‍यांनी कृत्रिम रेतन पध्दतीचा अवलंब करावा असे आवाहन पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी केले आहे. बु्रसेला जिवाणूच्या संसर्गाची लक्षणे वारंवार ताप येतो. मनुष्याच्या अंडकोषावर सूज येते. महिलांमध्ये गर्भपात होतो. काही कालावधीनंतर अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे हा जिवाणू मानवी प्रयोगशाळेतील तपासणी सहसा आढळून येत नाही. नवीनच असल्याने बर्‍याच डॉक्टरांना याची माहिती नाही.