शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

८,८०० विद्यार्थ्यांनी केली पुस्तके परत, आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

नागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी ...

नागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गेल्या वर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील ८,८०६ पालकांनी पुस्तके परत केली.

गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्यात वर्ग १ ते ८ च्या १ लाख ४९ हजार ९८३ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत ८ लाख १० हजार ४९८ पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ८,८०६ पालकांनी पुस्तकांचे संच आपापल्या तालुक्यातील गट साधन केंद्राकडे पाठविले. पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदांची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहनवजा विनंती शिक्षण विभागाने केली होती.

- तालुकानिहाय पुस्तके परत केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

तालुका विद्यार्थी संख्या

हिंगणा ९००

कामठी १०००

कळमेश्वर ७५०

सावनेर ४४७

नरखेड ४८०

काटोल ७५०

पारशिवनी ६४०

मौदा ४८५

रामटेक ५८०

कुही ६५०

भिवापूर ८१०

उमरेड ४५०

नागपूर ८६४

- दृष्टिक्षेपात

- गेल्या वर्षी ८ लाख १० हजार ४९८ पुस्तकांचे संच वाटप केले.

- यावर्षी जमा झालेले पुस्तकांचे संच वजा करून मागणी करण्यात येईल.

- काय म्हणतात पालक...

शासनाने पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. पुढच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या उपयोगाला ती येऊ शकतात. आम्हीसुद्धा शालेय जीवनात एकमेकांची पुस्तके वापरत होतो. हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवावा.

राजेंद्र ठाकरे, पालक

- शासनाकडून दरवर्षी पाठ्यपुस्तकांवर कोट्यवधीचा खर्च होतो. सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांची पुस्तके पडूनच असतात. यावर्षी तर विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत. सर्वांनीच पुस्तके परत करावीत.

लोकेश मसराम, पालक

- हा उपक्रम ऐच्छिक आहे. आमची पालकांवर जबरदस्ती नाही. पण शासनाचा पाठ्यपुस्तकावरील खर्च वाचत असेल तर पालकांनी पुस्तके परत करण्यास सहकार्य करावे. आतापर्यंत ज्यांनी पुस्तके परत केली नाही, त्यांनी पुस्तके परत करून सहकार्य करावे.

चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक