शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे

By योगेश पांडे | Updated: April 17, 2024 17:15 IST

आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे.

नागपूर : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपला ३४ जागा मिळाव्या ही पक्षाध्यक्ष म्हणून माझी व कोअर ग्रुपचीदेखील मागणी होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा सन्मान राखणेदेखील महत्त्वाचे होते. महायुतीचे जागावाटप करताना आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलो व त्यामुळेच काही जागांवर तडजोड करावी लागली, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे. कुठलीही रिस्क नको म्हणून तीनही पक्षांनी काही उमेदवार बदलले. यात आमच्याकडून ढवळाढवळ करण्याचा प्रश्न येत नाही. तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसून उमेदवार ठरविले. शिंदे १३ खासदार घेऊन महायुतीत आले होते व आता १५ मतदारसंघात त्यांचे उमेदवार उतरले आहेत. आमच्या सर्व सर्वेक्षणाची माहिती दोन्ही पक्षांना दिली होती, असे बावनकुळे यांनी सांगितले.

सर्व पक्षांचे मत घेऊनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली. विधानसभेत एक-दोन जागांसाठी तडजोड करावी लागली तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या २०० हून अधिक जागा महायुतीच्या निवडून येतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसने धोका दिला

बाबासाहेब आंबेडकरांना कॉंग्रेसने मुंबई, भंडाऱ्यात पराभूत केले होते. तर प्रकाश आंबेडकर यांनादेखील कॉंग्रेसने वर येऊ दिले नाही. कॉंग्रेसमुळेच आंबेडकर महाविकास आघाडीत जाऊ शकले नाही. कॉंग्रेसने त्यांना धोका दिला, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर